शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:42 IST

उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलिसांना हेल्दी बनवायचेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. २०१९ मध्ये नागपुरातील गुन्हेगारी आणि पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत ठेवला. यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर उपस्थित होते.डॉ. उपाध्याय म्हणाले, उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यात आणि गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात शहर पोलिसांनी यश मिळवले आहे. शहरातील ‘टॉप - २०’ गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांना कारागृहात डांबले. त्यामुळे अनेक गुन्हेगारांनी बाहेर पळ काढावा लागला आहे. यापुढे गुन्हेगारी नियंत्रणासोबतच हेल्दी पुलिसिंगवरही भर देण्याला आपण भर देणार असल्याचे ते म्हणाले.मोक्का कारवाईत राज्यात नागपूर पोलिसांनी ‘नंबर वन' स्थान मिळवले. गंभीर स्वरूपाचे वारंवार संघटीतपणे गुन्हेकरणा-या कुख्यात गुंडांच्या तब्बल १३ टोळ्यांविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आली. त्यातून ६५ कुख्यात गुंडांवर लगाम कसण्यात आला. तडीपारी, मपीडीएच्या कारवाईमध्येही वाढ करण्यात आली. एमपीडीए अंतर्गत ३३ गुंडांना मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील सर्वच मोठे आणि कुख्यात गुंड सध्या कारागृहात पडले आहेत. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी, प्राणांतिक अपघात अशा गुन्ह्यांसह बलात्कार, विनयभंग, खंडणी वसुली तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ८६३ गुन्हे कमी घडले. हा धडाका यापुढेही सुरूच राहिल, असे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.बंदूक अन् बुलेटपत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उपराजधानीत शस्त्रांची तस्करीसंबंधीचे गुन्हे वाढल्याचे मान्य केले. ते कमी करण्यासाठी गुन्हे शाखेने प्रयत्न चालविले असून, गतवर्षी ३१ गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. ज्यात ४१ आरोपींना बंदुकीसह अटक केली. तसेच ३४ पिस्तूल आणि ५२ काडतूस पोलिसांनी जप्त केल्याचे सांगितले. जप्त केलेल्या अग्निशस्त्रांमध्ये सर्वाधिक १७ विदेशी बनावटीचे पिस्तूल, १० देशी कट्टे, २ माऊजर, २ रायफल आणि ३ रिव्हॉल्वरचा समावेश आहे. शहरात अग्निशस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष योजना आखल्याचेही त्यांनी सांगितले.हेल्थ कार्ड देणार !कामाचा ताण आणि सततची दगदग यामुळे पोलिसांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना गंभीर व्याधी होतात. ते ध्यानात आल्यामुळेशहरात कार्यरत एएसआय ते शिपाईपदापर्यंतच्या सर्व पोलिसांची यापुढे नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना हेल्थ कार्डदेण्यात येईल. त्यांची अ, ब, क,अशी विभागणी करण्यात येणार आहे. अ गटात निरोगी, ब गटात मधुमेह ,उच्चरक्तदाब तर क गटात हृदयविकार असलेल्या पोलिसांचा समावेश करण्यात येईल. ब आणि क गटात समावेश असलेल्या कर्मचा-यांची यादी पोली मुख्यालय, नियंत्रण कक्ष तसेच संबंधित पोलीस ठाण्यात लावण्यात येईल. क गटात असलेल्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येऊन त्यांना बंदोबस्त अथवा तणाव असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात येणार नाही. या कर्मचा-यांना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामासाठी तैनात करण्यात येईल. पोलिसांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठीही विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्यायाम, योगा, समुपदेशन करूनही त्यांच्या आरोग्याला जपण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.लाचखोरीच्या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांवर बोलताना आयुक्तांनी कडक कारवाईचे सुतोवाच केले. लाचखोर, डिफॉल्टर पोलिसांना धडा शिकविल्याची उदाहरणेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितली. गुन्हा दाखल करण्यास विलंब करणे, विधी अधिका-यांकडे प्रकरण असल्याचे सांगून टाळाटाळ करण्यासह वादग्रस्त ठाणेदारांच्या कार्यशैलीचेही अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्यावर लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी हमी डॉ. उपाध्याय यांनी दिली.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयMediaमाध्यमे