शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

सायबर भामट्यांपासून सावध राहा, सायबर पोलिसांचे आवाहन

By सोमनाथ खताळ | Updated: September 28, 2023 15:25 IST

ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात.

बीड : सुटीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना जास्त घडतात. कारण सायबर पोलिसांकडे तक्रार केली तरी पुढील कारवाई करण्यासाठी बँकांची मदत हवी असते. अशावेळी बँक बंद असल्याने सायबर भामटे आपला डाव साधतात, असा अनुभव सायबर पोलिसांचा आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती व मोबाइलवर आलेला ओटीपी देऊ नये, अनोळखी लिंक उघडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात. त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन सायबर पोलिसांकडून संबंधित बँक आणि कंपनीला ई-मेल पाठविले जातातर; परंतु सुटी असल्याने त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळत नाही. एवढ्यात सायबर भामटे हे पळविलेली रक्कम काढून घेतात. त्यामुळे ती परत मिळविताना अथवा थांबविताना पोलिसांना कसरत करावी लागते. 

अनेकदा ही रक्कम मिळतही नाही. त्यामुळे सुट्यांमध्ये नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. आपली फसवणूक होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनि भारत काळे, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, निशिगंधा खुळे व सायबर टीमने केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम