शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सायबर भामट्यांपासून सावध राहा, सायबर पोलिसांचे आवाहन

By सोमनाथ खताळ | Updated: September 28, 2023 15:25 IST

ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात.

बीड : सुटीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना जास्त घडतात. कारण सायबर पोलिसांकडे तक्रार केली तरी पुढील कारवाई करण्यासाठी बँकांची मदत हवी असते. अशावेळी बँक बंद असल्याने सायबर भामटे आपला डाव साधतात, असा अनुभव सायबर पोलिसांचा आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती व मोबाइलवर आलेला ओटीपी देऊ नये, अनोळखी लिंक उघडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात. त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन सायबर पोलिसांकडून संबंधित बँक आणि कंपनीला ई-मेल पाठविले जातातर; परंतु सुटी असल्याने त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळत नाही. एवढ्यात सायबर भामटे हे पळविलेली रक्कम काढून घेतात. त्यामुळे ती परत मिळविताना अथवा थांबविताना पोलिसांना कसरत करावी लागते. 

अनेकदा ही रक्कम मिळतही नाही. त्यामुळे सुट्यांमध्ये नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. आपली फसवणूक होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनि भारत काळे, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, निशिगंधा खुळे व सायबर टीमने केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम