शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 04:31 IST

बीड जिल्ह्यात मूळ गाव । उदगीरला घेत होता शिक्षण

बीड : उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील नाळवंडी गावातील गणेश कैलास म्हेत्रे (२०) या विद्यार्थ्याने रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून स्वत:ला संपविले. शुक्रवारी त्याने विष घेतले होते. बीडच्या खासगी रुग्णालयात शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

नाळवंडीचे सरपंच व गणेशचे काका राधाकृष्ण म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सतत रॅगिंगचा त्रास होत होता. ‘तू खेड्यातला आहेस, डॉक्टर काय होणार’ अशा शब्दांत त्याचा अपमान केला जात असे. याशिवाय शारीरिक व मानसिक छळही केला गेला. याविषयी गणेशने अनेकदा घरी सांगितले होते. या तक्रारी ऐकून गणेशचे शिक्षक असलेले काका दामोदर व वडील कैलास यांनी महाविद्यालयाचे प्रशासन व संबंधित प्राध्यापकाकडे तोंडी तक्रारही केली होती. यापुढे आपल्या मुलास त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे गणेश पुन्हा महाविद्यालयात गेला होता. मात्र रॅगिंगचा त्रास वाढतच गेला. फी भरली असताना कॉलेज सोडले तर पैसे बुडतील, या भीतीने तो शिकत होता.

चार दिवसांपूर्वी तो गावी परत आला. यावेळीही त्याने रॅगिंगच्या त्रासाविषयी सांगितले. पण पुन्हा शिकायला जाण्यासही तो तयार झाला. काका राधाकृष्ण यांचा ७ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करून दुपारनंतर तो जाणार होता. पण सकाळी चहा घेऊन दुपारी जेवायला येतो म्हणून तो शेतात गेला. शेतात गेल्यानंतर त्याने विष प्राशन केले. दुपारी घरी आला, त्यावेळी त्याला उलटी झाली. तरीही त्याने काही सांगितले नाही.

घरच्यांनी गणेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, विष हे शरीरात भिनल्याने आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत राधाकृष्ण म्हेत्रे यांनी जवाब दिला.महाविद्यालयात रॅगिंग झालेले नाही. त्याचे रॅगिंग होत असल्याचे त्याच्या कुणाही नातेवाइकांनी सांगितले नव्हते.- डॉ. दत्ता पाटील, प्राचार्य, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय, उदगीर