शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

चाेवीस तास उलटले, अपहरण झालेल्या व्यावसायिकाचा अद्यापही ठावठिकाणा लागेना...

By आशीष गावंडे | Updated: May 14, 2024 22:27 IST

अरुणकुमार मगनलाल वाेरा अपहरण: पथदिवे बंद, सीसीटीव्हीचा मागमूस नाही; अपहरणाचा कट पूर्वनियाेजित

आशिष गावंडे, अकोला: शहरातील दगडी पूलानजिकच्या चार जीन परिसरातील व्यावसायिक अरुणकुमार मगनलाल वाेरा (६२) यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात इसमांनी अपहरण केल्याच्या घटनेला चाेवीस तासांचा कालावधी उलटून गेला असला तरी पाेलिसांना अपहृत व्यावसायिक वाेरा यांचा ठावठिकाणा लागला नाही. या घटनेतील अपहरणकर्त्यांचाही मागमूस लागत नसल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी परिसरातील पथदिवे बंद असल्याने व सीसीटीव्हीचा मागमूस नसल्याचे पाहता अपहरणाचा कट पूर्वनियाेजित असल्याचा संशय बळावला आहे.

रामदास पेठ पाेलिसांच्या हद्दीत येणाऱ्या दगडी पूल परिसरातील चार जीन भागातील रहिवाशी अरुणकुमार मगनलाल वाेरा यांचा काचेच्या बाॅटल खरेदी,विक्रीचा माेठा व्यवसाय आहे. चार जीन मधील त्यांच्या गाेडावूनमध्ये अनेक महिला व पुरुष कामावर असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात अनेकांची कायम वर्दळ राहत असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी (साेमवार १३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास वाेरा त्यांचे कामकाज आटाेपून घरी परत जाण्यासाठी निघाले हाेते. ते त्यांच्या गाडीजवळ पाेहाेचत नाहीत ताेच एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात दबा धरुन बसलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडून जबरदस्तीने वाहनात काेंबून जागेवरुन पळ काढला. यादरम्यान, वाेरा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाेलिसांना सांगितले. या झटापटीत अरुणकुमार यांचा माेबाइल जमिनीवर काेसळला. हा माेबाइल पाेलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी वाेरा यांचे पुतणे जिग्नेश प्रवीणकुमार वाेरा (४५ रा.राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ अकाेला) यांनी साेमवारी रात्री उशिरा रामदास पेठ पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे पाेलिसांनी भादंवि कलम ३६५,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबीयांची घालमेल वाढली!- अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणाला चाेवीस तासांचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांच्या कुटुंबियांना अपहरणकर्त्यांकडून काेणत्याही स्वरुपाची मागणी करण्यात आली नाही. हा प्रकार पाहता कुटुंबियांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. यामुळे तपास अधिकारीही काेड्यात पडले आहेत.

वाेरा यांच्याकडून अनेकांना मदत- शहरातील एका प्रतिष्ठीत व्यावसायिकाचे अपहरण झाल्याच्या घटनेने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अरुणकुमार वाेरा हे अनेकांना व्यवसायाकरीता आर्थिक मदत करीत असल्याची माहिती आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू व मदतीसाठी तत्पर राहत असल्यामुळे त्यांचे अपहरण कशासाठी केले असावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाेलिसांकडून आराेपींचा कसून शाेध- घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी यांनी आराेपींच्या शाेधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, रामदास पेठ पाेलिसांची काही पथके कामाला लावली आहेत. शहरवासियांना किंवा व्यावसायिकांना काही सुगावा किंवा माहिती असल्यास त्यांनी पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन ‘डीवायएसपी’सतीष कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण