शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चाेवीस तास उलटले, अपहरण झालेल्या व्यावसायिकाचा अद्यापही ठावठिकाणा लागेना...

By आशीष गावंडे | Updated: May 14, 2024 22:27 IST

अरुणकुमार मगनलाल वाेरा अपहरण: पथदिवे बंद, सीसीटीव्हीचा मागमूस नाही; अपहरणाचा कट पूर्वनियाेजित

आशिष गावंडे, अकोला: शहरातील दगडी पूलानजिकच्या चार जीन परिसरातील व्यावसायिक अरुणकुमार मगनलाल वाेरा (६२) यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात इसमांनी अपहरण केल्याच्या घटनेला चाेवीस तासांचा कालावधी उलटून गेला असला तरी पाेलिसांना अपहृत व्यावसायिक वाेरा यांचा ठावठिकाणा लागला नाही. या घटनेतील अपहरणकर्त्यांचाही मागमूस लागत नसल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी परिसरातील पथदिवे बंद असल्याने व सीसीटीव्हीचा मागमूस नसल्याचे पाहता अपहरणाचा कट पूर्वनियाेजित असल्याचा संशय बळावला आहे.

रामदास पेठ पाेलिसांच्या हद्दीत येणाऱ्या दगडी पूल परिसरातील चार जीन भागातील रहिवाशी अरुणकुमार मगनलाल वाेरा यांचा काचेच्या बाॅटल खरेदी,विक्रीचा माेठा व्यवसाय आहे. चार जीन मधील त्यांच्या गाेडावूनमध्ये अनेक महिला व पुरुष कामावर असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात अनेकांची कायम वर्दळ राहत असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी (साेमवार १३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास वाेरा त्यांचे कामकाज आटाेपून घरी परत जाण्यासाठी निघाले हाेते. ते त्यांच्या गाडीजवळ पाेहाेचत नाहीत ताेच एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात दबा धरुन बसलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडून जबरदस्तीने वाहनात काेंबून जागेवरुन पळ काढला. यादरम्यान, वाेरा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाेलिसांना सांगितले. या झटापटीत अरुणकुमार यांचा माेबाइल जमिनीवर काेसळला. हा माेबाइल पाेलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी वाेरा यांचे पुतणे जिग्नेश प्रवीणकुमार वाेरा (४५ रा.राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ अकाेला) यांनी साेमवारी रात्री उशिरा रामदास पेठ पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे पाेलिसांनी भादंवि कलम ३६५,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबीयांची घालमेल वाढली!- अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणाला चाेवीस तासांचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांच्या कुटुंबियांना अपहरणकर्त्यांकडून काेणत्याही स्वरुपाची मागणी करण्यात आली नाही. हा प्रकार पाहता कुटुंबियांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. यामुळे तपास अधिकारीही काेड्यात पडले आहेत.

वाेरा यांच्याकडून अनेकांना मदत- शहरातील एका प्रतिष्ठीत व्यावसायिकाचे अपहरण झाल्याच्या घटनेने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अरुणकुमार वाेरा हे अनेकांना व्यवसायाकरीता आर्थिक मदत करीत असल्याची माहिती आहे. त्यांचा स्वभाव मनमिळावू व मदतीसाठी तत्पर राहत असल्यामुळे त्यांचे अपहरण कशासाठी केले असावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाेलिसांकडून आराेपींचा कसून शाेध- घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी यांनी आराेपींच्या शाेधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, रामदास पेठ पाेलिसांची काही पथके कामाला लावली आहेत. शहरवासियांना किंवा व्यावसायिकांना काही सुगावा किंवा माहिती असल्यास त्यांनी पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन ‘डीवायएसपी’सतीष कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण