शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची केस दाखल झाल्याने ठाण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By जितेंद्र कालेकर | Updated: July 28, 2023 21:39 IST

वाहतूक पोलिसांनी छळ केल्याचा आईला मेसेज, नियमानुसार कारवाईचा पोलिसांचा दावा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्यावर ड्रंक अँड ड्राइव्हची केस दाखल झाल्याची तसेच पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्याच्या वैफल्यातून मनिष उतेकर (२४, रा. हनुमाननगर, वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याने ही आत्महत्या केली असून याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच न्याय द्यावा, अशी मागणी उतेकर कुटूंबीयांनी केली आहे.

ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कोपरी युनिटच्या कर्मचार्यांनी गटारी अमावस्येनिमित ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई मद्यपी वाहन चालकांवर केली होती. याच कारवाईमध्ये मनिष आणि त्याचे इतर दोन मित्र मिळाले. चालक मनिषवर मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याची कलम १८५ नुसार तर त्याच्या अन्य दोन साथीदारांवर कलम १८८ नुसार कारवाई झाली. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात जावे लागेल, असे सांगिततले. त्याने मात्र न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारावा, अशी मागणी केली. प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसही आपले ऐकत नसल्याच्या भावनेतून तसेच यातून झालेल्या मानसिक त्रासातून मनिषने २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कारवाई कायदेशीर होती.

वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये त्याच्या शरिरात अल्कोहोल मिळाले होते, तसा गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारुन मिटविण्यात यावे, अशी मनिष आणि त्याच्या मित्रांची अपेक्षा होती, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी सांगितले. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या नावाचे कोणीही पोलिस वाहतूक शाखेत नाहीत. तरी कुटूंबीयांच्या आरोपांचीही तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

वाहतूक पोलिस काय म्हणतात?

मद्य प्राशन करुन वाहन चालविल्यानंतर कोपरी वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये मनिष याच्यासह तिघे मिळाले. या प्रकरणात त्यांनी न्यायालयात जाणे अपेक्षित होते. यात त्यांना दंड झाला असता. त्यांचा कोणीही मानसिक छळ केलेला नाही. ते दुसऱ्या िदवशी येताे, म्हणाले. पण आलेच नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती, असे कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सांगितले.

मृत्यूपूर्वी आईला केला मेसेज-

मृत्यूपूर्वी मनिष याने आईला मोबाईलवरुन केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यांनी धमकी देऊन सांगितले की, तुम्हाला कोर्टात जावे लागेल. पुष्पक आणि सुधाकर या पोलिसांनी करियर बरबाद करायचे असल्याचे सांगितले. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो. कोणासोबत असे वागू नका, असा मेसेज दाखवत उतेकर कुटूंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. काेपरी िब्रजखली म िनषला पकडल्यानंतर पाेलिसांनी मान िसक त्रास िदल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आराेप त्याच्या भावाने केला आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हthaneठाणे