शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची केस दाखल झाल्याने ठाण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By जितेंद्र कालेकर | Updated: July 28, 2023 21:39 IST

वाहतूक पोलिसांनी छळ केल्याचा आईला मेसेज, नियमानुसार कारवाईचा पोलिसांचा दावा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्यावर ड्रंक अँड ड्राइव्हची केस दाखल झाल्याची तसेच पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्याच्या वैफल्यातून मनिष उतेकर (२४, रा. हनुमाननगर, वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याने ही आत्महत्या केली असून याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच न्याय द्यावा, अशी मागणी उतेकर कुटूंबीयांनी केली आहे.

ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कोपरी युनिटच्या कर्मचार्यांनी गटारी अमावस्येनिमित ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई मद्यपी वाहन चालकांवर केली होती. याच कारवाईमध्ये मनिष आणि त्याचे इतर दोन मित्र मिळाले. चालक मनिषवर मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याची कलम १८५ नुसार तर त्याच्या अन्य दोन साथीदारांवर कलम १८८ नुसार कारवाई झाली. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात जावे लागेल, असे सांगिततले. त्याने मात्र न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारावा, अशी मागणी केली. प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसही आपले ऐकत नसल्याच्या भावनेतून तसेच यातून झालेल्या मानसिक त्रासातून मनिषने २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कारवाई कायदेशीर होती.

वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये त्याच्या शरिरात अल्कोहोल मिळाले होते, तसा गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारुन मिटविण्यात यावे, अशी मनिष आणि त्याच्या मित्रांची अपेक्षा होती, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी सांगितले. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या नावाचे कोणीही पोलिस वाहतूक शाखेत नाहीत. तरी कुटूंबीयांच्या आरोपांचीही तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

वाहतूक पोलिस काय म्हणतात?

मद्य प्राशन करुन वाहन चालविल्यानंतर कोपरी वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये मनिष याच्यासह तिघे मिळाले. या प्रकरणात त्यांनी न्यायालयात जाणे अपेक्षित होते. यात त्यांना दंड झाला असता. त्यांचा कोणीही मानसिक छळ केलेला नाही. ते दुसऱ्या िदवशी येताे, म्हणाले. पण आलेच नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती, असे कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सांगितले.

मृत्यूपूर्वी आईला केला मेसेज-

मृत्यूपूर्वी मनिष याने आईला मोबाईलवरुन केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यांनी धमकी देऊन सांगितले की, तुम्हाला कोर्टात जावे लागेल. पुष्पक आणि सुधाकर या पोलिसांनी करियर बरबाद करायचे असल्याचे सांगितले. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो. कोणासोबत असे वागू नका, असा मेसेज दाखवत उतेकर कुटूंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. काेपरी िब्रजखली म िनषला पकडल्यानंतर पाेलिसांनी मान िसक त्रास िदल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आराेप त्याच्या भावाने केला आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हthaneठाणे