शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची केस दाखल झाल्याने ठाण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By जितेंद्र कालेकर | Updated: July 28, 2023 21:39 IST

वाहतूक पोलिसांनी छळ केल्याचा आईला मेसेज, नियमानुसार कारवाईचा पोलिसांचा दावा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्यावर ड्रंक अँड ड्राइव्हची केस दाखल झाल्याची तसेच पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्याच्या वैफल्यातून मनिष उतेकर (२४, रा. हनुमाननगर, वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याने ही आत्महत्या केली असून याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच न्याय द्यावा, अशी मागणी उतेकर कुटूंबीयांनी केली आहे.

ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कोपरी युनिटच्या कर्मचार्यांनी गटारी अमावस्येनिमित ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई मद्यपी वाहन चालकांवर केली होती. याच कारवाईमध्ये मनिष आणि त्याचे इतर दोन मित्र मिळाले. चालक मनिषवर मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याची कलम १८५ नुसार तर त्याच्या अन्य दोन साथीदारांवर कलम १८८ नुसार कारवाई झाली. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात जावे लागेल, असे सांगिततले. त्याने मात्र न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारावा, अशी मागणी केली. प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसही आपले ऐकत नसल्याच्या भावनेतून तसेच यातून झालेल्या मानसिक त्रासातून मनिषने २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कारवाई कायदेशीर होती.

वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये त्याच्या शरिरात अल्कोहोल मिळाले होते, तसा गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारुन मिटविण्यात यावे, अशी मनिष आणि त्याच्या मित्रांची अपेक्षा होती, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी सांगितले. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या नावाचे कोणीही पोलिस वाहतूक शाखेत नाहीत. तरी कुटूंबीयांच्या आरोपांचीही तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

वाहतूक पोलिस काय म्हणतात?

मद्य प्राशन करुन वाहन चालविल्यानंतर कोपरी वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये मनिष याच्यासह तिघे मिळाले. या प्रकरणात त्यांनी न्यायालयात जाणे अपेक्षित होते. यात त्यांना दंड झाला असता. त्यांचा कोणीही मानसिक छळ केलेला नाही. ते दुसऱ्या िदवशी येताे, म्हणाले. पण आलेच नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती, असे कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सांगितले.

मृत्यूपूर्वी आईला केला मेसेज-

मृत्यूपूर्वी मनिष याने आईला मोबाईलवरुन केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यांनी धमकी देऊन सांगितले की, तुम्हाला कोर्टात जावे लागेल. पुष्पक आणि सुधाकर या पोलिसांनी करियर बरबाद करायचे असल्याचे सांगितले. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो. कोणासोबत असे वागू नका, असा मेसेज दाखवत उतेकर कुटूंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. काेपरी िब्रजखली म िनषला पकडल्यानंतर पाेलिसांनी मान िसक त्रास िदल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आराेप त्याच्या भावाने केला आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हthaneठाणे