शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई होतेय ‘सोशल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:38 IST

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे.

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे. आजची पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. त्यांना समाजातील उपेक्षितांबद्दल आस्था वाटू लागली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यात तरुणाईचा कल वाढत आहे. त्यामुळे आता सुट्टीच्या दिवसांतही एन्जॉयमेंट करणारी ही पिढी याच कालावधीचा उपयोग करून, आदिवासी पाड्यांत, गावाखेड्यांत श्रमदान करताना दिसून येतेय. ही पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. मुंबई शहर-उपनगरातील महाविद्यालयांच्या वतीने शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत सामाजिक कार्य शिकविले जाते. मात्र, आता ही पिढी त्या पलीकडे जाऊन ग्रुप तयार करत, कुटुंबाने एकत्र जात किंवा बºयाचदा एकट्यानेही गावा-खेड्यांत, आदिवासी पाड्यांत जाऊन त्या लोकसंस्कृतीत रमतेय. शहरातलं धकाधकीचं जीवन सोडून, घड्याळाच्या काट्यावरच जगणं विसरून ही पिढी या लोकवस्तीत रमून खºया अर्थाने आयुष्य काय असते, हे अनुभवतेय. सध्या महाविद्यालयांना सुट्ट्य पडल्या आहेत.या दरम्यानही काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ग्रुप्स गावा-खेड्यांत काम करताना दिसतायत. ‘आरोह’ हा सामाजिक ग्रुप पालघर-डहाणूमधील लहानग्यांना मोफत संगीताचे धडे देतोय. या ग्रुपमधील विनय राजे सांगतो की, आम्ही दर वीकेंडला या गावात जातो. तेथील मुलांना घराघरांत जाऊन संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यांच्यासोबत जगण्याचा, राहण्याचा वेगळाच अनुभव घेऊन घरी येतो. गेली २ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुुरू आहे. ‘समाजस्नेही’ या मुलींच्या ग्रुपमधील पूजा शेवाळे सांगते की, आम्ही रस्त्यावरील मुलींना मासिक पाळीविषयी सांगतो. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी, त्याची विल्हेवाट लावण्याविषयी माहिती देतो. शिवाय, विविध आदिवासी पाड्यांतही पथनाट्याच्या माध्यमातून या विषयाबद्दल जनजागृती करतो.एकदंरित, अशा सामाजिक जगण्याने ही पिढी खºया अर्थाने समृद्ध होतेय. शहरातल्या मर्यादित ‘जगण्याची’ चौकट भेदून निसर्गाच्या शाळेत ही पिढी धडे गिरवतेय. गावा-खेड्यातील लोकसंस्कृती, विचार, राहणीमान, जीवनशैली यांच्याशी एकरुप होतेय. त्यामुळे अशा तरुणांचा आदर्श घेतला पाहिजे. जेणेकरुन, समाजाच्या समृद्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हे आदर्श पाऊल ठरेल.>एप्रिल महिन्यात सोशल रिस्पॉसिबिलीटी सेलच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील पाथर्डी गावात श्रमदान करण्यासाठी गेले होते. या गावात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तिथे पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले, तसेच गावात सरकारची ‘मी लाभार्थी’ योजना गावकºयांना समजून सांगितली, तसेच योजनेचा अर्ज गावकºयांकडून भरून घेतला. गावातील अंगणवाडी रंगवून सुशोभित करण्याचे काम केले गेले. श्रमदानातून आपल्यावर श्रम संस्कार घडतात. उन्हाळी सुट्टीमध्ये आपण स्वत:मधील कला, गुण ओळखू शकतो, तसेच समाजातील समस्या, अडचणी कोणकोणत्या आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजे. यातून समाजात बदल घडवून आणू शकतो.- मित्तल कांबळे, के. सी. महाविद्यालय>एका संस्थेच्या पुढाकाराने येऊर येथे गेल्या आठवड्यात रस्त्यावर राहणाºया लहान मुलांना शिकवणी देण्यासाठी गेलो होतो. रस्त्यावर काम करणाºया मजुरांच्या मुलांना सहजासहजी शिक्षण मिळत नाही. कारण त्यांना सतत जागा व ठिकाण बदलावे लागते. मग या मुलांना आठवड्यातील दर रविवारी गणित, इंग्रजी, चित्रकला, हस्तकला इत्यादी विषय शिकविले जायचे. मुलांना शिकविण्यात एक वेगळीच मज्जा मिळायची. मुलांच्या शिकवणीत बरेच अनुभव मिळाले. उन्हाळ्यात कित्येक लोक समर कॅम्प आयोजित करतात. या कॅम्पमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे आणि स्वत:ला सिद्ध करावे.- मयूर पवार, साठ्ये महाविद्यालय.

टॅग्स :collegeमहाविद्यालय