शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

तरुणाई होतेय ‘सोशल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:38 IST

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे.

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे. आजची पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. त्यांना समाजातील उपेक्षितांबद्दल आस्था वाटू लागली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यात तरुणाईचा कल वाढत आहे. त्यामुळे आता सुट्टीच्या दिवसांतही एन्जॉयमेंट करणारी ही पिढी याच कालावधीचा उपयोग करून, आदिवासी पाड्यांत, गावाखेड्यांत श्रमदान करताना दिसून येतेय. ही पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. मुंबई शहर-उपनगरातील महाविद्यालयांच्या वतीने शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत सामाजिक कार्य शिकविले जाते. मात्र, आता ही पिढी त्या पलीकडे जाऊन ग्रुप तयार करत, कुटुंबाने एकत्र जात किंवा बºयाचदा एकट्यानेही गावा-खेड्यांत, आदिवासी पाड्यांत जाऊन त्या लोकसंस्कृतीत रमतेय. शहरातलं धकाधकीचं जीवन सोडून, घड्याळाच्या काट्यावरच जगणं विसरून ही पिढी या लोकवस्तीत रमून खºया अर्थाने आयुष्य काय असते, हे अनुभवतेय. सध्या महाविद्यालयांना सुट्ट्य पडल्या आहेत.या दरम्यानही काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ग्रुप्स गावा-खेड्यांत काम करताना दिसतायत. ‘आरोह’ हा सामाजिक ग्रुप पालघर-डहाणूमधील लहानग्यांना मोफत संगीताचे धडे देतोय. या ग्रुपमधील विनय राजे सांगतो की, आम्ही दर वीकेंडला या गावात जातो. तेथील मुलांना घराघरांत जाऊन संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यांच्यासोबत जगण्याचा, राहण्याचा वेगळाच अनुभव घेऊन घरी येतो. गेली २ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुुरू आहे. ‘समाजस्नेही’ या मुलींच्या ग्रुपमधील पूजा शेवाळे सांगते की, आम्ही रस्त्यावरील मुलींना मासिक पाळीविषयी सांगतो. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी, त्याची विल्हेवाट लावण्याविषयी माहिती देतो. शिवाय, विविध आदिवासी पाड्यांतही पथनाट्याच्या माध्यमातून या विषयाबद्दल जनजागृती करतो.एकदंरित, अशा सामाजिक जगण्याने ही पिढी खºया अर्थाने समृद्ध होतेय. शहरातल्या मर्यादित ‘जगण्याची’ चौकट भेदून निसर्गाच्या शाळेत ही पिढी धडे गिरवतेय. गावा-खेड्यातील लोकसंस्कृती, विचार, राहणीमान, जीवनशैली यांच्याशी एकरुप होतेय. त्यामुळे अशा तरुणांचा आदर्श घेतला पाहिजे. जेणेकरुन, समाजाच्या समृद्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हे आदर्श पाऊल ठरेल.>एप्रिल महिन्यात सोशल रिस्पॉसिबिलीटी सेलच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील पाथर्डी गावात श्रमदान करण्यासाठी गेले होते. या गावात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तिथे पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले, तसेच गावात सरकारची ‘मी लाभार्थी’ योजना गावकºयांना समजून सांगितली, तसेच योजनेचा अर्ज गावकºयांकडून भरून घेतला. गावातील अंगणवाडी रंगवून सुशोभित करण्याचे काम केले गेले. श्रमदानातून आपल्यावर श्रम संस्कार घडतात. उन्हाळी सुट्टीमध्ये आपण स्वत:मधील कला, गुण ओळखू शकतो, तसेच समाजातील समस्या, अडचणी कोणकोणत्या आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजे. यातून समाजात बदल घडवून आणू शकतो.- मित्तल कांबळे, के. सी. महाविद्यालय>एका संस्थेच्या पुढाकाराने येऊर येथे गेल्या आठवड्यात रस्त्यावर राहणाºया लहान मुलांना शिकवणी देण्यासाठी गेलो होतो. रस्त्यावर काम करणाºया मजुरांच्या मुलांना सहजासहजी शिक्षण मिळत नाही. कारण त्यांना सतत जागा व ठिकाण बदलावे लागते. मग या मुलांना आठवड्यातील दर रविवारी गणित, इंग्रजी, चित्रकला, हस्तकला इत्यादी विषय शिकविले जायचे. मुलांना शिकविण्यात एक वेगळीच मज्जा मिळायची. मुलांच्या शिकवणीत बरेच अनुभव मिळाले. उन्हाळ्यात कित्येक लोक समर कॅम्प आयोजित करतात. या कॅम्पमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे आणि स्वत:ला सिद्ध करावे.- मयूर पवार, साठ्ये महाविद्यालय.

टॅग्स :collegeमहाविद्यालय