शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

तरुणाई होतेय ‘सोशल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:38 IST

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे.

सुट्टीच्या दिवसांत फुल्ल एन्जॉयमेंट करणाऱ्या तरूण पिढीची व्याख्या आता बदलत आहे. आजची पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. त्यांना समाजातील उपेक्षितांबद्दल आस्था वाटू लागली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यात तरुणाईचा कल वाढत आहे. त्यामुळे आता सुट्टीच्या दिवसांतही एन्जॉयमेंट करणारी ही पिढी याच कालावधीचा उपयोग करून, आदिवासी पाड्यांत, गावाखेड्यांत श्रमदान करताना दिसून येतेय. ही पिढी सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात ही तरुणाई केवळ ‘सोशली’ अ‍ॅक्टिव्ह न होता खºया अर्थाने सोशल होताना दिसते आहे. मुंबई शहर-उपनगरातील महाविद्यालयांच्या वतीने शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत सामाजिक कार्य शिकविले जाते. मात्र, आता ही पिढी त्या पलीकडे जाऊन ग्रुप तयार करत, कुटुंबाने एकत्र जात किंवा बºयाचदा एकट्यानेही गावा-खेड्यांत, आदिवासी पाड्यांत जाऊन त्या लोकसंस्कृतीत रमतेय. शहरातलं धकाधकीचं जीवन सोडून, घड्याळाच्या काट्यावरच जगणं विसरून ही पिढी या लोकवस्तीत रमून खºया अर्थाने आयुष्य काय असते, हे अनुभवतेय. सध्या महाविद्यालयांना सुट्ट्य पडल्या आहेत.या दरम्यानही काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ग्रुप्स गावा-खेड्यांत काम करताना दिसतायत. ‘आरोह’ हा सामाजिक ग्रुप पालघर-डहाणूमधील लहानग्यांना मोफत संगीताचे धडे देतोय. या ग्रुपमधील विनय राजे सांगतो की, आम्ही दर वीकेंडला या गावात जातो. तेथील मुलांना घराघरांत जाऊन संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यांच्यासोबत जगण्याचा, राहण्याचा वेगळाच अनुभव घेऊन घरी येतो. गेली २ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुुरू आहे. ‘समाजस्नेही’ या मुलींच्या ग्रुपमधील पूजा शेवाळे सांगते की, आम्ही रस्त्यावरील मुलींना मासिक पाळीविषयी सांगतो. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी, त्याची विल्हेवाट लावण्याविषयी माहिती देतो. शिवाय, विविध आदिवासी पाड्यांतही पथनाट्याच्या माध्यमातून या विषयाबद्दल जनजागृती करतो.एकदंरित, अशा सामाजिक जगण्याने ही पिढी खºया अर्थाने समृद्ध होतेय. शहरातल्या मर्यादित ‘जगण्याची’ चौकट भेदून निसर्गाच्या शाळेत ही पिढी धडे गिरवतेय. गावा-खेड्यातील लोकसंस्कृती, विचार, राहणीमान, जीवनशैली यांच्याशी एकरुप होतेय. त्यामुळे अशा तरुणांचा आदर्श घेतला पाहिजे. जेणेकरुन, समाजाच्या समृद्ध होण्याच्या दृष्टीकोनातून हे आदर्श पाऊल ठरेल.>एप्रिल महिन्यात सोशल रिस्पॉसिबिलीटी सेलच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील पाथर्डी गावात श्रमदान करण्यासाठी गेले होते. या गावात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तिथे पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून करण्यात आले, तसेच गावात सरकारची ‘मी लाभार्थी’ योजना गावकºयांना समजून सांगितली, तसेच योजनेचा अर्ज गावकºयांकडून भरून घेतला. गावातील अंगणवाडी रंगवून सुशोभित करण्याचे काम केले गेले. श्रमदानातून आपल्यावर श्रम संस्कार घडतात. उन्हाळी सुट्टीमध्ये आपण स्वत:मधील कला, गुण ओळखू शकतो, तसेच समाजातील समस्या, अडचणी कोणकोणत्या आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजे. यातून समाजात बदल घडवून आणू शकतो.- मित्तल कांबळे, के. सी. महाविद्यालय>एका संस्थेच्या पुढाकाराने येऊर येथे गेल्या आठवड्यात रस्त्यावर राहणाºया लहान मुलांना शिकवणी देण्यासाठी गेलो होतो. रस्त्यावर काम करणाºया मजुरांच्या मुलांना सहजासहजी शिक्षण मिळत नाही. कारण त्यांना सतत जागा व ठिकाण बदलावे लागते. मग या मुलांना आठवड्यातील दर रविवारी गणित, इंग्रजी, चित्रकला, हस्तकला इत्यादी विषय शिकविले जायचे. मुलांना शिकविण्यात एक वेगळीच मज्जा मिळायची. मुलांच्या शिकवणीत बरेच अनुभव मिळाले. उन्हाळ्यात कित्येक लोक समर कॅम्प आयोजित करतात. या कॅम्पमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे आणि स्वत:ला सिद्ध करावे.- मयूर पवार, साठ्ये महाविद्यालय.

टॅग्स :collegeमहाविद्यालय