शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वायसीएमयुचा सावळा गोंधळ

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ पार पडल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना पोस्टाने त्याच्या पत्त्यावर डीग्री सर्टीफिकेट पाठविण्यात आले.परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी (आ) या गावातील महादेव वसंतराव गुंड या विद्यार्थ्याच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र पोस्टामार्फत मिळू शकले नाहीत.
महादेव गुंड या विद्यार्थ्याने सांगितले, कला शाखेची पदवी मी मे 2013 मध्ये प्राप्त केली.त्याचे पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मी विद्यापीठाला अर्ज केला होता. खरेतर वायसीएमयुकडे मी माझा पुण्यातील पत्ता दिला होता.परंतु,परीक्षा विभागाने माझ्या गावाकडच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे पदवी प्रमाणपत्र पाठविले.परीक्षा विभागाकडून होत असलेल्या अशा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या किंवा विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला फेराव्या माराव्या लागत आहेत. मी स्वत:ने विभागीय केंद्रात जाऊन माझे प्रमाणपत्र घेवून आलो आहे.
वायसीएमयुच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ.अर्जुन घाटुळे यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.