शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

वायसीएमयुचा सावळा गोंधळ

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ पार पडल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना पोस्टाने त्याच्या पत्त्यावर डीग्री सर्टीफिकेट पाठविण्यात आले.परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी (आ) या गावातील महादेव वसंतराव गुंड या विद्यार्थ्याच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र पोस्टामार्फत मिळू शकले नाहीत.
महादेव गुंड या विद्यार्थ्याने सांगितले, कला शाखेची पदवी मी मे 2013 मध्ये प्राप्त केली.त्याचे पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मी विद्यापीठाला अर्ज केला होता. खरेतर वायसीएमयुकडे मी माझा पुण्यातील पत्ता दिला होता.परंतु,परीक्षा विभागाने माझ्या गावाकडच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे पदवी प्रमाणपत्र पाठविले.परीक्षा विभागाकडून होत असलेल्या अशा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या किंवा विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला फेराव्या माराव्या लागत आहेत. मी स्वत:ने विभागीय केंद्रात जाऊन माझे प्रमाणपत्र घेवून आलो आहे.
वायसीएमयुच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ.अर्जुन घाटुळे यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.