शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

तीन खोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी आयुक्तांना निवेदन : वडाळा उर्दू हायस्कूलमध्ये सोयीसुविधांची वानवा

By admin | Updated: August 12, 2016 01:32 IST

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.वडाळागावात एकाच इमारतीमध्ये सकाळ-दुपार सत्रात प्राथमिक शाळा भरते, तर याच इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये माध्यमिक विद्यालयाचे वर्ग भरत आहेत. सुरुवातीला शाळेची पटसंख्या कमी होती. त्यामुळे गैरसोय होत नव्हती मात्र मागील पाच वर्षांपासून शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून, सुमारे पावणे तीनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. वर्गखोल्यांची संख्या अपुरी असल्यामुळे संगणक कक्ष, प्रयोगशाळादेखील या ठिकाणी चालविता येणे अवघड झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इमारतीच्या गच्चीवर मंडप टाकून केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह नसून पिण्याच्या पाण्याचीही मुबलक व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. पाच वर्षांपासून सातत्याने उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. एकूणच गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण मंडळ सभापती व प्रशासनाधिकार्‍यांनी या शाळेत भेट देण्याची मागणी होत आहे. पंधरवड्यात शाळेच्या समस्या न सोडविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची एक प्रत प्रशासनधिकार्‍यांनाही देण्यात आली आहे.विद्यार्थीच करतात वर्गखोल्या स्वच्छउर्दू माध्यमिक विद्यालय व प्राथमिक उर्दू शाळेच्या एक ा सत्रामध्ये शिपाईच नसल्याने वर्गखोल्यांची तसेच शालेय आवाराची विद्यार्थ्यांनाच दोन दिवसाआड स्वच्छता करावी लागते. शाळेमध्ये शिपाई नियुक्त करण्याची प्रलंबित मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.