शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

तीन खोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी आयुक्तांना निवेदन : वडाळा उर्दू हायस्कूलमध्ये सोयीसुविधांची वानवा

By admin | Updated: August 12, 2016 01:32 IST

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.

नाशिक : शहरात महापालिकेच्या केवळ दोन उर्दू माध्यमिक शाळा असून, यापैकी एक वडाळागावात आहे. या शाळेला मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये पावणे तीनशे विद्यार्थी बसत आहेत. तसेच अन्य सोयीसुविधांचीदेखील वानवा आहे. याबाबत स्थायी समिती सदस्य रशिदा शेख यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांचे लक्ष वेधले आहे.वडाळागावात एकाच इमारतीमध्ये सकाळ-दुपार सत्रात प्राथमिक शाळा भरते, तर याच इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये माध्यमिक विद्यालयाचे वर्ग भरत आहेत. सुरुवातीला शाळेची पटसंख्या कमी होती. त्यामुळे गैरसोय होत नव्हती मात्र मागील पाच वर्षांपासून शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून, सुमारे पावणे तीनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. वर्गखोल्यांची संख्या अपुरी असल्यामुळे संगणक कक्ष, प्रयोगशाळादेखील या ठिकाणी चालविता येणे अवघड झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन इमारतीच्या गच्चीवर मंडप टाकून केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह नसून पिण्याच्या पाण्याचीही मुबलक व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. पाच वर्षांपासून सातत्याने उर्दू माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. एकूणच गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना भौतिक सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण मंडळ सभापती व प्रशासनाधिकार्‍यांनी या शाळेत भेट देण्याची मागणी होत आहे. पंधरवड्यात शाळेच्या समस्या न सोडविल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची एक प्रत प्रशासनधिकार्‍यांनाही देण्यात आली आहे.विद्यार्थीच करतात वर्गखोल्या स्वच्छउर्दू माध्यमिक विद्यालय व प्राथमिक उर्दू शाळेच्या एक ा सत्रामध्ये शिपाईच नसल्याने वर्गखोल्यांची तसेच शालेय आवाराची विद्यार्थ्यांनाच दोन दिवसाआड स्वच्छता करावी लागते. शाळेमध्ये शिपाई नियुक्त करण्याची प्रलंबित मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.