शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॅम्पसमधल्या आनंदमेळ्यात चहा विकला तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:06 IST

कॉलेजातल्या आनंदमेळ्यानं मार्केटिंगच नाही तर मैत्रीही शिकवली.

ठळक मुद्देअमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयातला एक उपक्रम.

-अश्विन उमाळे

विद्याभारती महाविद्यालय अमरावती, आनंदमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एकुण  151 स्टॉल्स. 600 हून अधिक सहभागी सदस्य.  अतिशय उत्साहात सुरु वात झाली.  शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरिक्षत व्यवहार.  ठरल्याप्रमाणे विद्यार्थी कॉलेज मध्ये आपल्या स्टॉल्सला आवश्यक असे साहित्य घेऊन येत होते. मग स्टॉल्सचं डेकोरेशन.  हा माझ्या आवडीचा प्रकार. हे इथे लाव, ते तिथे चांगलं नाही दिसत आहे, थोडं आणखी क्रिएटिव्ह करू. असं चांगलं दिसेल का? आणि खूप काही.  खूप गर्दी झाली होती.  अण्डर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटचे सारे विध्यार्थी आपापल्या कामात मग्न होते. पण मी हे बघितलं की,   कॉलेज मध्ये 2-2  महिने लागतात मुलामुलींना कॅम्पसमध्ये मध्ये मिसळण्यासाठी. दोस्ती होण्यासाठी. कोणी कोणी तर फक्त परीक्षा किंवा काही कामासाठीच दिसतात कॉलेज मध्ये. पण आज, निव्वळ एका महिन्यातच किती जवळीक वाटते आहे. तर गोष्ट आमच्या  स्टॉल नंबर 129 ची. आम्ही खूप सारे  पदार्थ सूचवले सरांना पण त्यातून फायनल झालं फक्त चहा आणि सूप.   झालं तर थंड सरबत वेळे वर ठरलं.  स्टॉलचं नाव सूर्र्र्र के पियो....चहा. आपलं राष्ट्रीय पेय. संपूर्ण आनंद मेळ्याच आमचाच एक चहाचा ठेला. आम्ही लागलो कामाला. किचनवाल्यांनी अगदी दर्जेदार आणि  उत्कृष्ट असा चहा, सूप व थंड सरबत विथ क्रिम बनवलं. सव्र्ह करणार्‍यांनी, कूपन फाडणार्‍यांनी आपली  जबाबदारी निभावली. आम्ही मार्केटिंगवाले.  मी सुद्धा मार्केटिंग मधेच होतो.  प्रॉडक्ट विकायची मोठी स्ट्रॅटेजीच आमची. आम्ही एमबीएच्या विद्याथ्र्यानी चहा वर शेरोशायरी, त्यानंतर रेल्वे स्टेशन वर जसे विकतात तसे ओरडणे, कॉर्पोरेट  स्टॅंडर्ड रीतीने विकणे. सर्वच मार्ग स्वीकारले. खूप मार्केटिंग केलं. बाकी स्टॉलवर काय काय आहे हे कोणाला माहित असेल किंवा नसेल पण  129 वर मस्त गरम गरम चहा मिळतोय हे मात्न अख्या कॉलेज ला कळून चुकलं होतं. बाकी .  पण खूप मस्त चालत होतं. राजस्थानी पेहराव केलेले चौकी धाम, पारंपरिक खाद्य, पाणीपुरी, भेळ  असे सगळेच होते. पण आम्ही चायवाले छा गये. सगळीकडे आमच्या मार्केटिंगचीच चर्चा.मग आनंद मेळा संपला.  काही मिनिटे मुले मुली डीजे वर खूप नाचली. मी नाही नाही नाचलो. मला नाचत नाही येत. मी व्हि डिओ  करत होतो. इथे झाली लिहिण्यासारखी गोष्ट. सगळ्यांना वाटत होतं, आपल्याला काय बक्षिस समारंभाचं, आपल्याला कुठं मिळणार आहे.  आम्ही फक्त इतरांसाठी मनापासून टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देणार होतो.  दुपारभर चहा बनवून, विकून,  ओरडून, नाचून आम्ही इतके थकलो होतो की आता सेल्फी मध्ये थकवा दिसत होता. आणि मग एकेक करत बक्षिसं जाहीर झाली. आणि शेवटचं बक्षीस जाहीर झालं स्टॉल नंबर 129 ला.  एक आनंदाची लहर उठली.  मुरझाये हुए फुल फिरसे खील गये.  पायात अचानक गती आली. धावलो सगळे स्टेज जवळ.  मग रात्नी ग्रुप वर मेसेजचा पाऊस. सगळे इतके थकले होते  तरीही कोणाला झोप येत नव्हती.आणि त्यातून एक गोष्ट घडली, आम्ही सारे एकमेकांचे मस्त मित्र बनलो.कॅम्पसने मार्केटिंगच नाही तर दर्यादिल मैत्रीही शिकवली.