शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कुलगुरू , शासनाकडे अमर्याद अधिकार

By admin | Updated: December 23, 2015 00:19 IST

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या नियुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिसभा ,विद्या परिषदेचे पूर्वीचे अधिकार खंडीत करण्यात आले असून कुलगुरूंना व राज्य शासनाला अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांंचे वारे वाहणार आहे. परंतु, प्रस्तावित कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असल्याने त्यात बदल करण्यास वाव आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या नियुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिसभा ,विद्या परिषदेचे पूर्वीचे अधिकार खंडीत करण्यात आले असून कुलगुरूंना व राज्य शासनाला अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांंचे वारे वाहणार आहे. परंतु, प्रस्तावित कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असल्याने त्यात बदल करण्यास वाव आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
राज्य शासनाने प्रस्तवित विद्यापीठ कायद्याबाबत कमालीची गोपनियता पाळली होती. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनाही प्रस्तावित कायद्यात कोणत्याबाबींचा समावेश करण्यात आला आहे. हे समजू शकले नाही. मात्र, सोमवारी कायद्याचा मसूदा विधानसभेच्या पटलावर ठेवल्यानंतर सर्व आमदारांना कायद्याच्या प्रती देण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर शिक्षण क्षेत्रांतील व्यक्तींची निवड लोकशाही पध्दतीने मतदान घेवून केली जात होती. परंतु, प्रस्तावित कायद्यामध्ये 10 प्राध्यापक , 10 प्राचार्य,4 संस्थाचालक,10 पदवीधर,2 पदव्युत्तर शिक्षक अशा केवळ 36 व्यक्तींची निवड केली जाणार आहे. या उलट विद्या परिषद , बोर्ड ऑफ स्टडीज,फॅकल्टी,अधिष्ठाता आदी पदांवर कुलगुरूंना 360 व्यक्तींची निवड करावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणूका घेण्याची तरतुद प्रस्तावित कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये पुन्हा एकदा निवडणूकीचा गुलाल उधळा जाणार आहे.कायद्यांतर्गत विद्यार्थी परिषद स्थापन केली जाणार आहे.प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्रपणे विद्यार्थी परिषद असेल. पूर्णवेळ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाचा या निवडणूकीत उमेदवार व मतदार होता येईल. विद्यापीठ विभागांकरिताही एकविद्यार्थी परिषद असेल. या परिषदा कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये भाग घेणार नाहीत. एनएसएस, एनसीसी, महिला प्रतिनिधी , क्रीडा प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत असतील. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक हे या परिषदेचे पदसिध्द सदस्य असतील.
--------------------