शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू , शासनाकडे अमर्याद अधिकार

By admin | Updated: December 23, 2015 00:19 IST

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या नियुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिसभा ,विद्या परिषदेचे पूर्वीचे अधिकार खंडीत करण्यात आले असून कुलगुरूंना व राज्य शासनाला अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांंचे वारे वाहणार आहे. परंतु, प्रस्तावित कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असल्याने त्यात बदल करण्यास वाव आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या नियुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिसभा ,विद्या परिषदेचे पूर्वीचे अधिकार खंडीत करण्यात आले असून कुलगुरूंना व राज्य शासनाला अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांंचे वारे वाहणार आहे. परंतु, प्रस्तावित कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असल्याने त्यात बदल करण्यास वाव आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
राज्य शासनाने प्रस्तवित विद्यापीठ कायद्याबाबत कमालीची गोपनियता पाळली होती. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनाही प्रस्तावित कायद्यात कोणत्याबाबींचा समावेश करण्यात आला आहे. हे समजू शकले नाही. मात्र, सोमवारी कायद्याचा मसूदा विधानसभेच्या पटलावर ठेवल्यानंतर सर्व आमदारांना कायद्याच्या प्रती देण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर शिक्षण क्षेत्रांतील व्यक्तींची निवड लोकशाही पध्दतीने मतदान घेवून केली जात होती. परंतु, प्रस्तावित कायद्यामध्ये 10 प्राध्यापक , 10 प्राचार्य,4 संस्थाचालक,10 पदवीधर,2 पदव्युत्तर शिक्षक अशा केवळ 36 व्यक्तींची निवड केली जाणार आहे. या उलट विद्या परिषद , बोर्ड ऑफ स्टडीज,फॅकल्टी,अधिष्ठाता आदी पदांवर कुलगुरूंना 360 व्यक्तींची निवड करावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणूका घेण्याची तरतुद प्रस्तावित कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये पुन्हा एकदा निवडणूकीचा गुलाल उधळा जाणार आहे.कायद्यांतर्गत विद्यार्थी परिषद स्थापन केली जाणार आहे.प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्रपणे विद्यार्थी परिषद असेल. पूर्णवेळ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाचा या निवडणूकीत उमेदवार व मतदार होता येईल. विद्यापीठ विभागांकरिताही एकविद्यार्थी परिषद असेल. या परिषदा कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये भाग घेणार नाहीत. एनएसएस, एनसीसी, महिला प्रतिनिधी , क्रीडा प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत असतील. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक हे या परिषदेचे पदसिध्द सदस्य असतील.
--------------------