शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कुलगुरू , शासनाकडे अमर्याद अधिकार

By admin | Updated: December 23, 2015 00:19 IST

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या नियुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिसभा ,विद्या परिषदेचे पूर्वीचे अधिकार खंडीत करण्यात आले असून कुलगुरूंना व राज्य शासनाला अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांंचे वारे वाहणार आहे. परंतु, प्रस्तावित कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असल्याने त्यात बदल करण्यास वाव आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या नियुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिसभा ,विद्या परिषदेचे पूर्वीचे अधिकार खंडीत करण्यात आले असून कुलगुरूंना व राज्य शासनाला अमर्याद अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणूकांंचे वारे वाहणार आहे. परंतु, प्रस्तावित कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असल्याने त्यात बदल करण्यास वाव आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
राज्य शासनाने प्रस्तवित विद्यापीठ कायद्याबाबत कमालीची गोपनियता पाळली होती. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनाही प्रस्तावित कायद्यात कोणत्याबाबींचा समावेश करण्यात आला आहे. हे समजू शकले नाही. मात्र, सोमवारी कायद्याचा मसूदा विधानसभेच्या पटलावर ठेवल्यानंतर सर्व आमदारांना कायद्याच्या प्रती देण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर शिक्षण क्षेत्रांतील व्यक्तींची निवड लोकशाही पध्दतीने मतदान घेवून केली जात होती. परंतु, प्रस्तावित कायद्यामध्ये 10 प्राध्यापक , 10 प्राचार्य,4 संस्थाचालक,10 पदवीधर,2 पदव्युत्तर शिक्षक अशा केवळ 36 व्यक्तींची निवड केली जाणार आहे. या उलट विद्या परिषद , बोर्ड ऑफ स्टडीज,फॅकल्टी,अधिष्ठाता आदी पदांवर कुलगुरूंना 360 व्यक्तींची निवड करावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणूका घेण्याची तरतुद प्रस्तावित कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये पुन्हा एकदा निवडणूकीचा गुलाल उधळा जाणार आहे.कायद्यांतर्गत विद्यार्थी परिषद स्थापन केली जाणार आहे.प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्रपणे विद्यार्थी परिषद असेल. पूर्णवेळ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाचा या निवडणूकीत उमेदवार व मतदार होता येईल. विद्यापीठ विभागांकरिताही एकविद्यार्थी परिषद असेल. या परिषदा कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये भाग घेणार नाहीत. एनएसएस, एनसीसी, महिला प्रतिनिधी , क्रीडा प्रतिनिधी या मतदान प्रक्रियेत असतील. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक हे या परिषदेचे पदसिध्द सदस्य असतील.
--------------------