शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्वच्छता हा संस्कार म्हणून स्वीकारावा कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील : उमवित क्लीन कॅम्पस उपक्रम

By admin | Updated: November 5, 2016 00:13 IST

जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबविल्या जाणाज्या स्वच्छता पंधरवड्याच्या (क्लीन कॅम्पस) उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.

जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबविल्या जाणाज्या स्वच्छता पंधरवड्याच्या (क्लीन कॅम्पस) उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
सुरुवातीला प्रा. संजय पत्की, अलका चव्हाण, तेजस मराठे, गोपाळ ठाकरे, धनंजय देशमुख, अजिंक्य इनामदार यांनी राम का गुणगान, संत मिराबाई यांच्या मिरा हो गयी मगन या भजनाने केली. स्वच्छता अभियानाची शपथ कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी दिली.

१ ते १५ नोव्हेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचे सर्व सॅटेलाईट सेंटर ( अमळनेर, धुळे, नंदूरबार) येथे परिसर स्वच्छता कार्यक्रम होतील. ११ रोजी सागर पार्क ते जी.एस.ग्राऊंड परिसर स्वच्छता , १२ रोजी प्रशासकीय इमारत, अधिसभा सभागृह, पदवीप्रदान सभागृह, पाणी पुरवठा इमारत आणि पाळधी गाव व परिसर, १३ रोजी मुले व मुलींचे वसतिगृह, १५ रोजी परिसर स्वच्छता व श्रमदानाने या पंधरवड्याचा समारोप होईल.
प्रास्ताविक उपकुलसचिव डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण यांनी केले.कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन, बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कर्‍हाड, परीक्षा नियंत्रक डी.एन.गुजराथी, प्रा.सत्येंद्र मिश्रा, प्रा.जे.बी.नाईक आदी उपस्थित होते. सागरमित्र अभियानाचे विशाल सोनकुळ यांनी देशातील व परदेशातील विविध शाळांमध्ये स्वच्छतेसंदर्भात राबविण्यात येणार्‍या चळवळींविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सत्यजित साळवे यांनी केले.