शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ विद्यार्थी परिषद पदग्रहण

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

(फोटो आहे- रॅपमध्ये)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा अखेर सोमवारी पार पडला. निवडणुकांनंतर सुमारे चार महिन्यांनंतर पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांऐवजी पक्ष व संघटनांच्या धोरणांबाबत माहिती देण्यावरच जास्त भर दिला. त्यामुळे हा सोहळा विद्यार्थ्यांचा होता की राजकीय पक्षांचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
रामदासपेठ येथील श्रीमंत पूर्णचंद बुटी सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या या सोहळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पदग्रहण केले. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष नितेश फुलेकर, सचिव बालाजी रामराव माट्टमवाड अणि सर्व प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांची उपस्थिती होती. शिवाय राष्टवादी युवक काँग्रेस राज्य प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुधे, डॉ.अविनाश तितरमारे, अभाविपच्या प्रदेश मंत्री शुभांगी नक्षिणे, उपाध्यक्ष प्रा.अजय चौहान, महानगर मंत्री गौरव हरडे हेदेखील उपस्थित होते.
विद्यापीठात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून या समस्या प्रशासनामोर येतात. विद्यार्थी परिषदांच्या हातात विद्यापीठाची प्रतिमा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य मागण्यांवरच संघटनांनी आंदोलन करावे असे मत डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले. देशात नवीन नेतृत्व निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल अपेक्षित आहेत असे प्रतिपादन अतुल लोंढे यांनी केले. तर विद्यार्थी परिषदेला बळकट करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असा चिमटा प्रा.अजय चौहान यांनी काढला. याशिवाय विद्यार्थी संघटनांकडून मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी पक्ष व संघटनांचे धोरण मांडण्यावरच जास्त भर दिला.