शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

विद्यापीठ विद्यार्थी परिषद पदग्रहण

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

(फोटो आहे- रॅपमध्ये)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा अखेर सोमवारी पार पडला. निवडणुकांनंतर सुमारे चार महिन्यांनंतर पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांऐवजी पक्ष व संघटनांच्या धोरणांबाबत माहिती देण्यावरच जास्त भर दिला. त्यामुळे हा सोहळा विद्यार्थ्यांचा होता की राजकीय पक्षांचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
रामदासपेठ येथील श्रीमंत पूर्णचंद बुटी सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या या सोहळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पदग्रहण केले. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष नितेश फुलेकर, सचिव बालाजी रामराव माट्टमवाड अणि सर्व प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांची उपस्थिती होती. शिवाय राष्टवादी युवक काँग्रेस राज्य प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुधे, डॉ.अविनाश तितरमारे, अभाविपच्या प्रदेश मंत्री शुभांगी नक्षिणे, उपाध्यक्ष प्रा.अजय चौहान, महानगर मंत्री गौरव हरडे हेदेखील उपस्थित होते.
विद्यापीठात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून या समस्या प्रशासनामोर येतात. विद्यार्थी परिषदांच्या हातात विद्यापीठाची प्रतिमा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य मागण्यांवरच संघटनांनी आंदोलन करावे असे मत डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले. देशात नवीन नेतृत्व निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल अपेक्षित आहेत असे प्रतिपादन अतुल लोंढे यांनी केले. तर विद्यार्थी परिषदेला बळकट करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असा चिमटा प्रा.अजय चौहान यांनी काढला. याशिवाय विद्यार्थी संघटनांकडून मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी पक्ष व संघटनांचे धोरण मांडण्यावरच जास्त भर दिला.