शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

विद्यापीठ विद्यार्थी परिषद पदग्रहण

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

(फोटो आहे- रॅपमध्ये)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा अखेर सोमवारी पार पडला. निवडणुकांनंतर सुमारे चार महिन्यांनंतर पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांऐवजी पक्ष व संघटनांच्या धोरणांबाबत माहिती देण्यावरच जास्त भर दिला. त्यामुळे हा सोहळा विद्यार्थ्यांचा होता की राजकीय पक्षांचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
रामदासपेठ येथील श्रीमंत पूर्णचंद बुटी सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या या सोहळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पदग्रहण केले. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष नितेश फुलेकर, सचिव बालाजी रामराव माट्टमवाड अणि सर्व प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांची उपस्थिती होती. शिवाय राष्टवादी युवक काँग्रेस राज्य प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुधे, डॉ.अविनाश तितरमारे, अभाविपच्या प्रदेश मंत्री शुभांगी नक्षिणे, उपाध्यक्ष प्रा.अजय चौहान, महानगर मंत्री गौरव हरडे हेदेखील उपस्थित होते.
विद्यापीठात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून या समस्या प्रशासनामोर येतात. विद्यार्थी परिषदांच्या हातात विद्यापीठाची प्रतिमा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य मागण्यांवरच संघटनांनी आंदोलन करावे असे मत डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले. देशात नवीन नेतृत्व निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल अपेक्षित आहेत असे प्रतिपादन अतुल लोंढे यांनी केले. तर विद्यार्थी परिषदेला बळकट करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असा चिमटा प्रा.अजय चौहान यांनी काढला. याशिवाय विद्यार्थी संघटनांकडून मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी पक्ष व संघटनांचे धोरण मांडण्यावरच जास्त भर दिला.