शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

कुणबी महासंघाच्या गुणवंत सोहळ्यात अमिता चव्हाण यांचे प्रतिपादन

कुणबी महासंघाच्या गुणवंत सोहळ्यात अमिता चव्हाण यांचे प्रतिपादन
नांदेड : दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी विशिष्ट शाखेतच प्रवेश घ्यावा, असा आग्रह पालकांनी न धरता त्यांच्या इच्छा व आवडीनुसार शिक्षणाचे क्षेत्र निवडू दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येईल, असे प्रतिपदान आ.अमिता चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्यावतीने कुसुम सभागृह येथे १० जुलै रोजी आयोजित दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून आ.अमिता चव्हाण बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डी.पी.सावंत, शारदा भवन शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र चव्हाण, पत्रकार केशव घोणसे पाटील, उद्योजक बालाजीराव जाधव, प्रदेशाध्यक्ष गिरिष जाधव, मंगलाताई धुळेकर, नगरसेविका ललिता शिंदे, कृषीभूषण रामराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ.चव्हाण म्हणाल्या, आजच्या युगात विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी अमूक प्रकारच्याच शाखेत प्रवेश घ्यावा असा पालकांचा आग्रह असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा नसतांना प्रवेश घेतलेल्या क्षेत्रात त्यांना यश मिळविणे अवघड जाते, यासाठी पालकांनी समजून घेवून त्यांच्या आवडीनुसार शाखेत प्रवेश दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
मार्गदर्शन करतांना, आ.डी.पी.सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी असून त्यांनी ध्येय डोळ्यासमोर घेवून चालावे, तरच शिक्षणात प्रगती होईल. नरेंद्र चव्हाण म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे असेल तर संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना सायन्स, कॉमर्स, सीए, टॅक्स कन्सल्टट, आयटीआय आदी क्षेत्रात आपले करीअर करण्याची संधी असून त्यांनी अधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे असे आवाहन केले. कार्यक्रमात १५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला.
मंचावर कार्याध्यक्ष संतोष मुळे, संजय कदम, राजेश बेंबरे, आर.बी.काकडे, माधव कदम, सुखदेव जाधव, जिल्हाध्यक्ष देविदास मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रत्नमाला व्यवहारे, नारायणराव पवार, छ.शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन कहाळेकर, सुनंदा इंगळे, ललिता पाटील, आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन ॲड.दिगंबर देशमुख व भाग्यश्री कदम यांनी तर आभार सुखदेव जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी संतोष कोसमेटकर, सुजीत लहानकर, अशोक व्यवहारे, सुनील बिजलगावे, नामदेव जाधव, आनंद किरकण, सुनील लुंगारे, गजान चव्हाण, पिंटू लोमटे आदींनी परिश्रम घेतले.