शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

प्लास्टिकची पिशवी आपण नाहीच वापरली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 17:10 IST

झाडं लावणं, जगवणं,प्लास्टिक न वापरणं हे सारं आपण स्वतःपासून कधी सुरु करणार?

ठळक मुद्देआपल्या अवतीभोवती जगणं फुलावं म्हणून आपण जबाबदारी घेऊन तर पाहू.

- अर्चना पाटील 

एक झाड लाऊ मित्रा , त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू ! हे गाण्याचे बोल चिन्मयच्या तोंडात ऐकले आणि त्या चार ओळीत कीती मोठा संदेश आहे हे जाणवले. बालकनीत तुळशीला पाणी टाकत असताना शाळेची प्रभातफेरी दिसली तर तेथेही मुलींची घोषणा होती, कावळा करतो कावकाव,माणसा माणसा झाडे लाव. नकळतच मनात एक प्रश्न येऊन गेला की प्राचीन काळरत वृक्षारोपण अभियान राबवले असतील का? -नाही. मग आजच्या काळात आपल्याला लोकांना क्षणोक्षणी जाणीव करून द्यावी लागते की वृक्ष आपले मित्न आहेत. त्यांची लागवड करा. असं का?याला जबाबदार कोण? आपणच! पाऊस पडला नाही की शेतकर्‍यांची होणारी तगमग, उन्हाळ्यात तापमानाचा वाढणारा पारा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे वाढणारे प्रमाण, पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायी फिरणार्‍या स्त्रिया ही परिस्थिती कोणी निर्माण केली तर आपण. त्यामुळे त्यावर उपाययोजनाही करणार आपणच. त्यातला प्रमुख उपाय आहे वृक्षारोपण.

एक दिवस आपली टेरेसवरची पाण्याची टाकी सकाळीच रिकामी झाली आणि दिवसभर वीजपुरवठाही खंडीत झाला तर आपण दिवसभर पाणीपाणी करतो. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीत मुरणार्‍या पाण्याच्या टाक्या भरल्या  नाहीत तर आपले काय होईल याचा विचार तर करा.

घरात बसून मी माझ्या देशासाठी काय करू शकते असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी उत्तरं मिळतात, तुम्ही विनाकारण चालू असलेला नळ बंद करा. घरात विनाकारण चालणारे लाईट्स आणि फॅन बंद करा. केवळ आपले घरच स्वच्छ न करता आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ करा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण देशाची सेवाच करतो.

मी  रोजच्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळे जाणूनबुजून करते आहे ही भावना नक्कीच तुम्हाला आनंद देऊन जाईल. त्यात वृक्षारोपण हा असा छंद आहे की तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर जोपासता येतो. विशेष म्हणजे या छंदासाठी तुम्हाला द्यावा लागतो तो केवळ तुमचा वेळ आणि थोडेसे कष्ट. काही छंद हे आपल्या आवडीनुसार आपण निवडत असतो तर काळाची गरज म्हणून एखादा छंद आपण आपल्या भावी पिढीसाठी निवडून पाहूया. आपल्या आजूबाजूला खुप काही गोष्टी घडत असतात पण आपण आपले कान - डोळे बंद करून आपल्याच विश्वात रममाण असतो. या स्वार्थीपणाच्या चादरीतून बाहेर निघण्याची गरज आहे .  शासन प्लँस्टीक पिशवीवर बंदी आणेल तेव्हाच आपण ती वापरणे बंद करणे गरजेचे आहे का? आपल्या मनानेच आपण प्लँस्टीक पिशवी टाळणे आधिक योग्य आहे. आपण निदान सुरुवात तर करू स्वतःपासून!