शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

By admin | Updated: June 11, 2016 22:56 IST

आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेतल्याशिवाय डंपर हलवू न देण्याचा पवित्रा गावकर्‍यांनी घेतल्याने पोलिसांची पंचाईत झाली होती.

लातूर : लातूर जिल्‘ातील विनाअनुदानित शिक्षक दिनकर निकम हे गेल्या १३ वर्षांपासून एका विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावित आहेत़ परंतू त्यांना अद्यापपर्यंत वेतनाविना सेवा बजावावी लागत आहे़ परंतू, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने रात्रीच्या वेळी किर्तनसेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़
घरात शिक्षणाचा वारसा नसतानाही बीएसस्सी बीपीएड पर्यंतचे शिक्षण घेऊन नौकरीच्या शोधासाठी भटकंती सुरु केली़ घरात माझे जास्तीचे शिक्षण झाल्यामुळे मला नक्की नोकरी मिळेल अशी आशा आई वडीलांसह कुटुंबातील सर्वांनाच होती़ परंतू, नौकरी काही मिळाली नाही़ जागा निघाली की मी इंटरव्युव्ह ला हजर राहत होतो़ जिल्‘ातच नाही तर परजिल्‘ातही अनेक ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्युव्ह दिला़ परंतू, यश काही मिळाले नाही़ अखेर २०१४ मध्ये औसा तालुक्यातील मोहरगा येथे शिक्षकाची नोकरी मिळाली़ उशिरा का होईना नोकरी मिळाल्यामुळे कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंदाला पारावारच उरला नव्हता़ परंतू, शाळा विनाअनुदानित असल्याने अनुदान मिळेल तेव्हाच पगार मिळेल असे संस्थाचालकांनी सांगितले़ याचा निरोपही मी घरी दिला़ परंतू, आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर नोकरी कर असा सल्ला घरच्यांनी दिला़ परंतू, १२ जणांच्या कुटुंबाचा संसार भागणार कसा या विवंचनेत होतो़ परंतू थोडा परमार्थिक अभ्यास असल्याने नोकरी करून मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा सुरु केली़ अन् त्यातून मिळालेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले़ १ ना २ वर्ष तब्बल १३ वर्ष पगारीविनाच नोकरी सुरु असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याबाबत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या माध्यमातून न्यायासाठी लढा सुरु आहे़ परंतू अजूनही शासनाला जाग येत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा़़़
घरात स्वत: मी, आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुले असा एकूण १२ जणांचा परिवार आहे़ नावालाच शेती त्यावरही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही़ त्यामुळे घरात एकमेव मी च नोकरीला होता़ मलाही पगार मिळत नसल्याने शाळेतूल मिळेल त्या वेळेत नविन गावाची निवड करून त्या गावात रात्री ९ ते ११ किर्तन करून मिळेल त्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले असून, दुष्काळी परिस्थितीत या किर्तन सेवेचाच आर्थिक आधार कुटुंंबाला मिळत आहे़