शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

By admin | Updated: June 11, 2016 22:56 IST

आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेतल्याशिवाय डंपर हलवू न देण्याचा पवित्रा गावकर्‍यांनी घेतल्याने पोलिसांची पंचाईत झाली होती.

लातूर : लातूर जिल्‘ातील विनाअनुदानित शिक्षक दिनकर निकम हे गेल्या १३ वर्षांपासून एका विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावित आहेत़ परंतू त्यांना अद्यापपर्यंत वेतनाविना सेवा बजावावी लागत आहे़ परंतू, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने रात्रीच्या वेळी किर्तनसेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़
घरात शिक्षणाचा वारसा नसतानाही बीएसस्सी बीपीएड पर्यंतचे शिक्षण घेऊन नौकरीच्या शोधासाठी भटकंती सुरु केली़ घरात माझे जास्तीचे शिक्षण झाल्यामुळे मला नक्की नोकरी मिळेल अशी आशा आई वडीलांसह कुटुंबातील सर्वांनाच होती़ परंतू, नौकरी काही मिळाली नाही़ जागा निघाली की मी इंटरव्युव्ह ला हजर राहत होतो़ जिल्‘ातच नाही तर परजिल्‘ातही अनेक ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्युव्ह दिला़ परंतू, यश काही मिळाले नाही़ अखेर २०१४ मध्ये औसा तालुक्यातील मोहरगा येथे शिक्षकाची नोकरी मिळाली़ उशिरा का होईना नोकरी मिळाल्यामुळे कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंदाला पारावारच उरला नव्हता़ परंतू, शाळा विनाअनुदानित असल्याने अनुदान मिळेल तेव्हाच पगार मिळेल असे संस्थाचालकांनी सांगितले़ याचा निरोपही मी घरी दिला़ परंतू, आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर नोकरी कर असा सल्ला घरच्यांनी दिला़ परंतू, १२ जणांच्या कुटुंबाचा संसार भागणार कसा या विवंचनेत होतो़ परंतू थोडा परमार्थिक अभ्यास असल्याने नोकरी करून मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा सुरु केली़ अन् त्यातून मिळालेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले़ १ ना २ वर्ष तब्बल १३ वर्ष पगारीविनाच नोकरी सुरु असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याबाबत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या माध्यमातून न्यायासाठी लढा सुरु आहे़ परंतू अजूनही शासनाला जाग येत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा़़़
घरात स्वत: मी, आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुले असा एकूण १२ जणांचा परिवार आहे़ नावालाच शेती त्यावरही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही़ त्यामुळे घरात एकमेव मी च नोकरीला होता़ मलाही पगार मिळत नसल्याने शाळेतूल मिळेल त्या वेळेत नविन गावाची निवड करून त्या गावात रात्री ९ ते ११ किर्तन करून मिळेल त्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले असून, दुष्काळी परिस्थितीत या किर्तन सेवेचाच आर्थिक आधार कुटुंंबाला मिळत आहे़