शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

शाळा - महाविद्यालये झालीत बंद

शाळा - महाविद्यालये झालीत बंद
नागपूर : धुवाधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडली. सकाळी मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्ते दिसत नव्हते आणि ठिकठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक लोक कार्यालयात जाण्यासाठी रेनकोट घालून निघाले पण रस्त्यावर तयार झालेल्या तलावातून मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेक पगारदार कर्मचारी माघारी वळले. त्यात लहान मुलांच्या काळजीपोटी अनेक पालकांनी मुलांना सकाळी शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नगण्य होती. दुपारपर्यंत पाऊस धो धो कोसळत असल्याने आणि शहरात पाणी साचल्याने शाळांमध्येही भीतीचे वातावरण होते. त्यामुळे शाळा सुरू झाली पण अभ्यासाचे वातावरण नव्हते. त्यातच शाळा व्यवस्थापनाने काही काळानंतर शाळेला सुटी देणे योग्य ठरविले. पावसाचा कहर पाहता अनेक शाळांनी शाळेला सुटी दिली तर काहींनी नाममात्र वेळ शाळा घेऊन शाळेला सुटी देण्याचा निर्णय घेतला. यामागे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची भावना होती. अनेक महाविद्यालयात तर आज एकही तासिका होऊ शकली नाही. प्राध्यापक वर्ग महाविद्यालयांमध्ये कसेबसे पोहोचले पण महाविद्यालयात विद्यार्थीच पोहोचू शकले नाही. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. अखेर अनेक संस्थांनी महाविद्यालयांना सुटी दिली.
------
स्कूल व्हॅन्स, ऑटो आलेच नाहीत.
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच कहर केला. अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी ऑटो आणि स्कूल व्हॅन्स लावल्या आहेत. पण पावसाचे रौद्र रुप पाहता स्कूल व्हॅन चालक आणि ऑटो चालकांनी मुलांना शाळेत नेणे धोक्याचे समजून आज सेवा दिली नाही. पाऊस थांबेल आणि शाळा सुरळीत होतील, असे पालकांनाही वाटले होते. त्यामुळे स्कूल व्हॅनची प्रतीक्षा करीत विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार होते. पण स्कूल व्हॅन चालकांनीच अनेक पालकांना बाहेर पूरसदृश स्थिती असल्याचे सांगून आज शाळेत पाल्यांना पाठवू नका, असे आवाहन केले. स्कूल व्हॅन चालक सकाळी नियमित सेवा देण्यासाठी बाहेर पडल्यावर शहरातल्या अनेक भागात पाणी साचल्याचे दृश्य पाहून मुलांना शाळेत नेणे घातक ठरु शकते, हे ओळखले. त्यामुळे जवळपास सर्वच स्कूल व्हॅन चालकांनी परस्परांना दूरध्वनी करून संभाव्य धोक्याची कल्पना दिली. तसेच पालकांनाही दूरध्वनीवर शहरातील स्थिती भयावह असल्याची कल्पना दिली. त्यामुळे पालकांनीही मुलांना शाळेत न पाठविण्याचाच निर्णय घेतला.