शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

पाऊस

By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST

शाळा - महाविद्यालये झालीत बंद

शाळा - महाविद्यालये झालीत बंद
नागपूर : धुवाधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडली. सकाळी मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्ते दिसत नव्हते आणि ठिकठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. अनेक लोक कार्यालयात जाण्यासाठी रेनकोट घालून निघाले पण रस्त्यावर तयार झालेल्या तलावातून मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेक पगारदार कर्मचारी माघारी वळले. त्यात लहान मुलांच्या काळजीपोटी अनेक पालकांनी मुलांना सकाळी शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नगण्य होती. दुपारपर्यंत पाऊस धो धो कोसळत असल्याने आणि शहरात पाणी साचल्याने शाळांमध्येही भीतीचे वातावरण होते. त्यामुळे शाळा सुरू झाली पण अभ्यासाचे वातावरण नव्हते. त्यातच शाळा व्यवस्थापनाने काही काळानंतर शाळेला सुटी देणे योग्य ठरविले. पावसाचा कहर पाहता अनेक शाळांनी शाळेला सुटी दिली तर काहींनी नाममात्र वेळ शाळा घेऊन शाळेला सुटी देण्याचा निर्णय घेतला. यामागे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची भावना होती. अनेक महाविद्यालयात तर आज एकही तासिका होऊ शकली नाही. प्राध्यापक वर्ग महाविद्यालयांमध्ये कसेबसे पोहोचले पण महाविद्यालयात विद्यार्थीच पोहोचू शकले नाही. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. अखेर अनेक संस्थांनी महाविद्यालयांना सुटी दिली.
------
स्कूल व्हॅन्स, ऑटो आलेच नाहीत.
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच कहर केला. अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी ऑटो आणि स्कूल व्हॅन्स लावल्या आहेत. पण पावसाचे रौद्र रुप पाहता स्कूल व्हॅन चालक आणि ऑटो चालकांनी मुलांना शाळेत नेणे धोक्याचे समजून आज सेवा दिली नाही. पाऊस थांबेल आणि शाळा सुरळीत होतील, असे पालकांनाही वाटले होते. त्यामुळे स्कूल व्हॅनची प्रतीक्षा करीत विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार होते. पण स्कूल व्हॅन चालकांनीच अनेक पालकांना बाहेर पूरसदृश स्थिती असल्याचे सांगून आज शाळेत पाल्यांना पाठवू नका, असे आवाहन केले. स्कूल व्हॅन चालक सकाळी नियमित सेवा देण्यासाठी बाहेर पडल्यावर शहरातल्या अनेक भागात पाणी साचल्याचे दृश्य पाहून मुलांना शाळेत नेणे घातक ठरु शकते, हे ओळखले. त्यामुळे जवळपास सर्वच स्कूल व्हॅन चालकांनी परस्परांना दूरध्वनी करून संभाव्य धोक्याची कल्पना दिली. तसेच पालकांनाही दूरध्वनीवर शहरातील स्थिती भयावह असल्याची कल्पना दिली. त्यामुळे पालकांनीही मुलांना शाळेत न पाठविण्याचाच निर्णय घेतला.