शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

ऑनलाइन संचमान्यतेमुळे अडचण

By admin | Updated: August 1, 2016 23:58 IST

पारदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ्यांची तुकडी ग्रा‘ धरली जाते. पूर्वी जे प्रमाण ६०-४० होते; आज ते १२०-८० वर आले आहे. ज्या संस्था व महाविद्यालयांमध्ये यापूर्वी जास्तीच्या अनुदानीत तुकड्या मान्य आहेत. त्यांनी या तुकड्यांसाठी तेव्हाच्या गरजेनुसार शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र, आताच्या प्रमाणानुसार माध्यमिकप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.

पारदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ्यांची तुकडी ग्रा‘ धरली जाते. पूर्वी जे प्रमाण ६०-४० होते; आज ते १२०-८० वर आले आहे. ज्या संस्था व महाविद्यालयांमध्ये यापूर्वी जास्तीच्या अनुदानीत तुकड्या मान्य आहेत. त्यांनी या तुकड्यांसाठी तेव्हाच्या गरजेनुसार शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र, आताच्या प्रमाणानुसार माध्यमिकप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.
शासनाकडून सवलतीची मागणी
मध्यंतरी वाणिज्य शाखेतही अशी स्थिती उद्भवली होती. तेव्हा शासनाने वाणिज्य शाखेच्या उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी त्या शैक्षणिक वर्षासाठी सवलत दिली होती. त्याच धर्तीवर आता शासनाने कला शाखेला ही सवलत द्यावी, यासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून लढा सुरू आहे. पूर्वी संचमान्यता मॅन्युअली होत असल्याने त्या-त्या शाखेत प्रवेशित विद्यार्थी संख्येत बदल करता येत होता. परंतु आता ऑनलाइन असल्याने सॉफ्टवेअरमध्ये ते बदल होत नाहीत. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थी तुकडी संख्या १२० वरून ८० करावी. तसेच वैकल्पिक विषयांसाठी विद्यार्थी तुकडी संख्या ही ६० करावी तसेच संचमान्यता ऑनलाइनऐवजी मॅन्युअली करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

कोट............
कला शाखेला विद्यार्थी प्राधान्य देत नाहीत. ही स्थिती बदलत नाही तोवर शासनाने माध्यमिक शाळा व वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी विद्यार्थी तुकडी संख्या नियमित विषयांसाठी १२० वरून सरसकट ८० तर वैकल्पिक विषयांसाठी ६० केली पाहिजे. पुढे विद्यार्थ्यांचा कला शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यात पुन्हा बदल करता येऊ शकतो.
-प्रा.सुनील गरूड, ज्येेष्ठ मार्गदर्शक, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.