शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

्रगरीब उपवरांनाही लाभणार आयुष्याचा जोडीदार (भाग १)

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

- मैत्री परिवार संस्था : विष्णुजी की रसोईचा उपक्रम

- मैत्री परिवार संस्था : विष्णुजी की रसोईचा उपक्रम
नागपूर : भारतीय परंपरेत विवाहाचा विधी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची पद्धत आहे. आयुष्याचे महत्त्वाचे वळण आनंदी करण्याचाच उद्देश त्यामागे असला तरी बदलत्या काळात प्रत्येकाला हा सोहळा आर्थिकदृष्ट्या पेलवणारा नसतो. अत्यंत कमी खर्चातही विवाह करणे अनेक गरीब गरजू उपवर-वधूंना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण त्यांना बरेचदा अनुभवता येत नाही. यासाठी मैत्री परिवार संस्था आणि विष्णुजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक महाविवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळ २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बजाजनगरच्या वासवी लॉनमध्ये होणार असल्याची माहिती मैत्री परिवार संस्थेचे प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महाविवाह सोहळ्यात एकूण ४४ उपवर-वधूंचा विवाह करण्यात येणार आहे. हा सोहळा यशस्वी आणि आनंदी करण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून तयारी सुरू आहे. सोहळ्यात विवाह होणाऱ्या वधू- वरांची नावे निवृत्त पोलीस अधिकारी अनिल बोबडे आणि मैत्री परिवाराच्या महिला कार्यकर्त्यांनी वधू - वरांच्या मुलाखती घेऊन निवडली. विवाहापासून वंचित असलेल्या ४० जोडप्यांचे विवाह लावूनच आपल्या लग्नाची चाळिशी साजरी करावी, असा विचार एका सहृदाच्या मनात आल्यानंतर त्यांनी मैत्री परिवार संस्थेशी संपर्क साधला आणि हा महाविवाह सोहळा आकाराला आला. महाविवाह सोहळ्यात सर्व धर्म, समाजाच्या रीती, नियम पाळून लग्न लावण्यात येणार आहेत. महाविवाह सोहळ्यात ८० टक्के आंतरजातीय विवाह होणार असून सर्वांची नावे रजिस्ट्रारकडे नोंदवून प्रमाणपत्र देण्यात येतील. सोहळ्यात वर-वधूकडील प्रत्येकी १५ जणांना पासेस देऊन बोलविण्यात येईल. ५ जोडप्यांचा ग्रुप करून लग्न लावण्यात येईल. बाहेरगावावरून येणाऱ्या जोडप्यांची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. केवळ आर्थिक पातळीवर विवाह अडतात अशांचे विवाह लावून देणे एवढाच या महाविवाह सोहळ्याचा उद्देश नाही तर विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचे संसार नीट चालावेत यासाठी या जोडप्यांना ६ व्यक्तीच्या कुटुंबाला लागतील एवढी भांडी, संसारोपयोगी वस्तू आणि त्यांच्या नावाने १० हजार रुपये बँकेत डिपॉझिट करण्यात येणार आहेत.