शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भावनिक एकात्मतेतूनच साधेल राष्ट्रीय एकात्मता संयुक्त निबंध स्पर्धेत महाराष्ट्र गुजरातचे १ हजार विद्यार्थी

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे: महाराष्ट्र-गुजरात मध्ये राजकीय स्तरावर कितीही आरोपप्रत्यारोप होत राहोत, विद्यार्थी जगतावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या गत ५१ वर्षांच्या उपक्रमावरून दिसते आहे. राष्ट्रभाषा सभेच्या वतीने या दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार्‍या संयुक्त हिंदी निबंध स्पर्धेत यंदा १ हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

पुणे: महाराष्ट्र-गुजरात मध्ये राजकीय स्तरावर कितीही आरोपप्रत्यारोप होत राहोत, विद्यार्थी जगतावर त्याचा फारसा परिणाम होत नाही असेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या गत ५१ वर्षांच्या उपक्रमावरून दिसते आहे. राष्ट्रभाषा सभेच्या वतीने या दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार्‍या संयुक्त हिंदी निबंध स्पर्धेत यंदा १ हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
निबंध स्पर्धा गुजरात व महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी व एकांकिका तसेच वक्तृत्व वगैरे स्पर्धा राज्यासाठी याप्रकारे गत ५१ वर्षे सभा हिंदी भाषा प्रसारासाठी प्रयत्नशील आहे. नुकताच या स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसिद्ध नाट्यसमीक्षक वि. भा. देशपांडे व माजी आमदार उल्हास पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी या दोन्ही वक्त्यांनीही सभेच्या या उपक्रमाचे खास कौतुक केले.
अशा प्रकारच्या स्पर्धांमधून भावनिक एकात्मता साधली जाते. राष्ट्रगीत तसेच समुहगीत गायनाच्या स्पर्धाही याचसाठी विविध ठिकाणी घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता साधेल असे उल्हास पवार यांनी सांगितले. देशपांडे म्हणाले, ' सर्व थोर व्यक्तींचे व्यक्तिमत्व शालेय जीवनातच घडले आहे. वाचनातून, स्पर्धांमधील सहभागातून त्यांनी स्वत:ला घडवले. स्पर्धांमुळे शालेय जीवनातच चांगले संस्कार होतात, तेच पुढे उपयोगी पडतात'
संस्थेचे सचिव शं. आ. जगताप यांनी प्रास्तविक केले. कार्याध्यक्ष डॉ. वीणा मनचंदा यांनी संस्थेची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पवार व देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. वंदना ठकार यांनी सुत्रसंचालन केले. सुनेत्रा गोंदकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)