शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

उलगडल्या करिअरच्या असंख्य वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 18:31 IST

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियां

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल, त्यांनी आतापासूनच एमएच-सीईटी, जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी केली पाहिजे. ११ वी, १२ वी विज्ञान शाखेच्या माध्यमातून पुढे करिअरच्या असंख्य वाटा आहेत. आयआयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय सेवा, एसएटी-एमसीएटी (या प्रवेश परीक्षा देऊन विदेशात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करता येते), स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये १० वीनंतर उत्तम संधी असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
पूरक व्यवस्था असल्याशिवाय करिअरचा मार्ग बदलू नका
अनेक जण १० वी किंवा १२ वीनंतर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळतात. मात्र, हे क्षेत्र प्रचंड आव्हानात्मक आहे. दीर्घकाळ संघर्ष व मेहनत घेतल्यानंतरही या क्षेत्रात पदरी अपयश येते. अशा वेळी खूप वेळ निघून जाते. त्यामुळे पूरक व्यवस्था असल्याशिवाय कधीही करिअरचा मार्ग बदलू नये. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गावर चालावे. दुर्दैवाने या मार्गावर चालताना अपयश आले तरी आधी घेतलेल्या शिक्षणामुळे नोकरी मिळवता येते, असा मौलिक सल्ला संदीप पाटील यांनी कार्यशाळेत दिला.
या कार्यक्रमासाठी अक्षय पवार, पंकज पाटील, चेतन जाधव, चेतना बर्‍हाटे, विनोद शिरसाठ, पूनम पाटील यांच्यासह विवेकानंद क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.