शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

उलगडल्या करिअरच्या असंख्य वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 18:31 IST

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियां

या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध महत्त्वपूर्ण परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआय, ११ वी कला, ११ वाणिज्य किंवा ११ वी विज्ञान शाखेतही प्रवेश घेता येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे; शिवाय ज्यांना आपल्या आई-वडिलांना लवकर मदतीचा हात देण्याची इच्छा आहे; अशा विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा डिप्लोमाकडे वळावे. ११ वी कला शाखेच्या माध्यमातून पुढे डी.एड् व बी.एड् करून शिक्षकाची नोकरी मिळवता येऊ शकते. ११ वाणिज्य शाखेच्या माध्यमातूनही पुढे सीए, टॅक्स कन्सल्टंट, बीबीए, एमबीबी यासारखे कोर्स करता येऊ शकतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल, त्यांनी आतापासूनच एमएच-सीईटी, जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी केली पाहिजे. ११ वी, १२ वी विज्ञान शाखेच्या माध्यमातून पुढे करिअरच्या असंख्य वाटा आहेत. आयआयटी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय सेवा, एसएटी-एमसीएटी (या प्रवेश परीक्षा देऊन विदेशात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करता येते), स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये १० वीनंतर उत्तम संधी असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
पूरक व्यवस्था असल्याशिवाय करिअरचा मार्ग बदलू नका
अनेक जण १० वी किंवा १२ वीनंतर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळतात. मात्र, हे क्षेत्र प्रचंड आव्हानात्मक आहे. दीर्घकाळ संघर्ष व मेहनत घेतल्यानंतरही या क्षेत्रात पदरी अपयश येते. अशा वेळी खूप वेळ निघून जाते. त्यामुळे पूरक व्यवस्था असल्याशिवाय कधीही करिअरचा मार्ग बदलू नये. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गावर चालावे. दुर्दैवाने या मार्गावर चालताना अपयश आले तरी आधी घेतलेल्या शिक्षणामुळे नोकरी मिळवता येते, असा मौलिक सल्ला संदीप पाटील यांनी कार्यशाळेत दिला.
या कार्यक्रमासाठी अक्षय पवार, पंकज पाटील, चेतन जाधव, चेतना बर्‍हाटे, विनोद शिरसाठ, पूनम पाटील यांच्यासह विवेकानंद क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.