शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

योग्य मार्ग निवडल्यास जीवन यशस्वी - देशमुख

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

दिंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर काठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व कवी प्रशांत केंदळे उपस्थितीत होते.प्राचार्य विलास देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना अपयश आले तरी खचून न जाता योग्य मार्ग निवडून यशस्वी जीवन जगता येते हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आईवडील, शाळा, शिक्षक, समाज, देश यांचे आपणावर मोठे ऋण असून त्यांच्या ऋणात राहून विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी व नावलौकिक मिळवून यशस्वी व्हावे. तसेच शिक्षणाबरोबर उत्तम दर्जाचे नागरिक घडणेही देशासाठी गरजेचे असून चांगल्या नागरीकांमुळेच देशाची प्रगती होते. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मस्

दिंडोरी - तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने एस.एस.सी.2016 च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य व स्कूल कमीटी अध्यक्ष शंकर काठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व कवी प्रशांत केंदळे उपस्थितीत होते.प्राचार्य विलास देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना अपयश आले तरी खचून न जाता योग्य मार्ग निवडून यशस्वी जीवन जगता येते हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आईवडील, शाळा, शिक्षक, समाज, देश यांचे आपणावर मोठे ऋण असून त्यांच्या ऋणात राहून विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी व नावलौकिक मिळवून यशस्वी व्हावे. तसेच शिक्षणाबरोबर उत्तम दर्जाचे नागरिक घडणेही देशासाठी गरजेचे असून चांगल्या नागरीकांमुळेच देशाची प्रगती होते. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
कवी प्रशांत केंदळे यांनी मार्गदर्शन करता करता आपल्या हास्यकवितांबरोबरच उद्बोधक कविता ऐकवून विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण न घेता परीक्षेकडे संधी म्हणून पाहण्याचे व कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील चांगल्या गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी जीवनात श्रमाचे महत्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक ए.वाय.हडस , स्कूल कमीटी उपाध्यक्ष सोपान रहाणे ,बाळासाहेब विधाते , सुरेश घुमरे , शंकर वाघ , दत्तात्रेय दाभाडे ,मधुकर घुमरे ,निवृत्ती घुमरे, दशरथ विधाते , माजी पंचायत समतिी सदस्य सुनिल घुमरे आदींसह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थीनी कु.दिपाली घुमरे व चैताली सुर्यवंशी यांनी तर आभार त्रिवेणी घुमरे हिने मानले. (०२ दिंडोरी१)