शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आजपासून बारावीची परीक्षा सुरू

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजाराने वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजाराने वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे.
राज्यातील ७ हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी मंडळाचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ उपस्थित होते.
मागील वर्षी १२ लाख ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती,असे नमूद करून पाटील म्हणाले, यंदा ७ लाख ५७ हजार १३६ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून मागील वर्षी ६ लाख ६४ हजार १२० मुलांनी नोंदणी केली होती. तसेच गेल्या वर्षी ५ लाख ३६ हजार ४२९ मुलींनी केली होती. त्यात सुमारे ४५ हजाराने वाढ झाली असून यंदा ५ लाख ८२ हजार ०६६ मुली परीक्षा देणार आहेत.
पाटील म्हणाले,राज्य मंडळातर्फे पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार असून बहुतांश परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे विभागीय मंडळांमार्फत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाही गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ या प्रमाणे राज्यात एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी बैठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मंडळातर्फे घेतल्या जाणा-या माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून यंदा ९३ हजार ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,असे नमूद करून पाटील म्हणाले, मागील वर्षी ७८ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विषय घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १४ हजाराने वाढ झाली आहे.तसेच १७ नंबरच अर्ज भरून परीक्षा देणा-या विद्यार्थांची संख्याही वाढत चालली आहे.
--------------------------