शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आजपासून बारावीची परीक्षा सुरू

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजाराने वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १ लाख ३८ हजाराने वाढ झाली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालवधीत होणार आहे.
राज्यातील ७ हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी मंडळाचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ उपस्थित होते.
मागील वर्षी १२ लाख ५४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती,असे नमूद करून पाटील म्हणाले, यंदा ७ लाख ५७ हजार १३६ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून मागील वर्षी ६ लाख ६४ हजार १२० मुलांनी नोंदणी केली होती. तसेच गेल्या वर्षी ५ लाख ३६ हजार ४२९ मुलींनी केली होती. त्यात सुमारे ४५ हजाराने वाढ झाली असून यंदा ५ लाख ८२ हजार ०६६ मुली परीक्षा देणार आहेत.
पाटील म्हणाले,राज्य मंडळातर्फे पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार असून बहुतांश परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे विभागीय मंडळांमार्फत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाही गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ या प्रमाणे राज्यात एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे संवेदनशील परीक्षा केंद्रांचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी बैठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मंडळातर्फे घेतल्या जाणा-या माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून यंदा ९३ हजार ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,असे नमूद करून पाटील म्हणाले, मागील वर्षी ७८ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान विषय घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल १४ हजाराने वाढ झाली आहे.तसेच १७ नंबरच अर्ज भरून परीक्षा देणा-या विद्यार्थांची संख्याही वाढत चालली आहे.
--------------------------