शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणशाळांविषयी शासनाची अनास्था २ वर्षापासून भेट अहवाल धूळखात

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

समिती गठित करूनही अहवालावर कार्यवाही नाही

समिती गठित करूनही अहवालावर कार्यवाही नाही
पुणे :दगडखाण क्षेत्रातील पाषाणशाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय अभ्यास समितीचा भेट अहवाल शासनदराबारी दोन वर्षापासून धूळखात पडला आहे. समितीच्या सदस्यांनी दिलेल्या शिफारसींचा कच्चा मसूदा तयार करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे २०१३ मध्येच सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप परिषदेने समितीची दखल घेत साधी बैठकही घेतलेली नाही तर शासनर्णिय कधी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शासनानेच गठित केलेल्या या समितीच्या अध्यक्ष व सचिवांनीच दगडखाणीच्या व पाषाण शाळेला एकदा ही भेट दिलेली नाही. यावरूनच शासकीय अधिकार्‍यांची अनास्था स्पष्ट होत असली तरी याचा परिणाम पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणाबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने १ डिसेंबर २०१२ रोजी ९ सदस्यीय अभ्यास समिती जाहीर केली. या समितीने काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन २ महिन्यांच्या आत शासनाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित होते. यानंतर या समितीने ऑक्टोबर २०१३ मध्ये पुण्यातील २२ पाषाण शाळांपैकी २० पाषाणशाळा व दगडखाण शाळांना भेटी दिल्या. या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविदा वाढव्यात यासाठी त्यांनी पाहणी करून प्रत्येक सदस्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे अहवाल सादर केला. या अहवालावरून परिषदेने शिफारसींचा कच्चा अहवाल सादर केला. मात्र यावर पुढे कोणतेच पाऊल उचलले नाही.
याविषयी समितीतील सदस्य व संतुलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बस्तु रेगे म्हणाले, दगडखाण मुलांच्या शिक्षणात सुधारणा व्हाव्यात म्हणून २०१२ मध्ये शासन निर्णय जाहीर करून शासकीय समिती गठीत करण्यात आली होती. मात्र समितीच्या भेटींच्या अहवालानंतर, त्यांनी मांडलेल्या शिफारसींसाठी एकही बैठक झाली नाही. याऊलट समितीचे अध्यक्ष असणारे राज्य प्रकल्प संचालक व सचिव असणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक यांनी एकाही दगडखाण शाळेला भेट दिलेली नाही. त्यामुळे समितीच्या अध्यक्ष व सचिवांना हा प्रश्न सोडविण्याविषयीची अनास्था स्पष्ट होते. मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत मात्र दाद मिळत नाही. टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात. मागील वर्षभर राज्य प्रकल्पसंचालक हे प्रभारी होते. मात्र आता पूर्णवेळ संचालक येऊनही काम जैसे थे आहे.
चौकट

समितीने केलेल्या शिफारसींवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन पाषाण शाळांना विश्ेाष बाबीअंतर्गत मान्यता मिळावी अन्यथा मुंबई येथे २ ऑक्टोबर २०१५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दगडखाण कामगार परिषद व पाषाण शाळा शिक्षक संघाच्यावतीने बस्तु रेगे यांनी दिला.