शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाषाणशाळांविषयी शासनाची अनास्था २ वर्षापासून भेट अहवाल धूळखात

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

समिती गठित करूनही अहवालावर कार्यवाही नाही

समिती गठित करूनही अहवालावर कार्यवाही नाही
पुणे :दगडखाण क्षेत्रातील पाषाणशाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय अभ्यास समितीचा भेट अहवाल शासनदराबारी दोन वर्षापासून धूळखात पडला आहे. समितीच्या सदस्यांनी दिलेल्या शिफारसींचा कच्चा मसूदा तयार करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे २०१३ मध्येच सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप परिषदेने समितीची दखल घेत साधी बैठकही घेतलेली नाही तर शासनर्णिय कधी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शासनानेच गठित केलेल्या या समितीच्या अध्यक्ष व सचिवांनीच दगडखाणीच्या व पाषाण शाळेला एकदा ही भेट दिलेली नाही. यावरूनच शासकीय अधिकार्‍यांची अनास्था स्पष्ट होत असली तरी याचा परिणाम पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणाबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने १ डिसेंबर २०१२ रोजी ९ सदस्यीय अभ्यास समिती जाहीर केली. या समितीने काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन २ महिन्यांच्या आत शासनाकडे अहवाल सादर करणे अपेक्षित होते. यानंतर या समितीने ऑक्टोबर २०१३ मध्ये पुण्यातील २२ पाषाण शाळांपैकी २० पाषाणशाळा व दगडखाण शाळांना भेटी दिल्या. या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविदा वाढव्यात यासाठी त्यांनी पाहणी करून प्रत्येक सदस्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे अहवाल सादर केला. या अहवालावरून परिषदेने शिफारसींचा कच्चा अहवाल सादर केला. मात्र यावर पुढे कोणतेच पाऊल उचलले नाही.
याविषयी समितीतील सदस्य व संतुलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बस्तु रेगे म्हणाले, दगडखाण मुलांच्या शिक्षणात सुधारणा व्हाव्यात म्हणून २०१२ मध्ये शासन निर्णय जाहीर करून शासकीय समिती गठीत करण्यात आली होती. मात्र समितीच्या भेटींच्या अहवालानंतर, त्यांनी मांडलेल्या शिफारसींसाठी एकही बैठक झाली नाही. याऊलट समितीचे अध्यक्ष असणारे राज्य प्रकल्प संचालक व सचिव असणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक यांनी एकाही दगडखाण शाळेला भेट दिलेली नाही. त्यामुळे समितीच्या अध्यक्ष व सचिवांना हा प्रश्न सोडविण्याविषयीची अनास्था स्पष्ट होते. मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत मात्र दाद मिळत नाही. टोलवाटोलवीची उत्तरे मिळतात. मागील वर्षभर राज्य प्रकल्पसंचालक हे प्रभारी होते. मात्र आता पूर्णवेळ संचालक येऊनही काम जैसे थे आहे.
चौकट

समितीने केलेल्या शिफारसींवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन पाषाण शाळांना विश्ेाष बाबीअंतर्गत मान्यता मिळावी अन्यथा मुंबई येथे २ ऑक्टोबर २०१५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दगडखाण कामगार परिषद व पाषाण शाळा शिक्षक संघाच्यावतीने बस्तु रेगे यांनी दिला.