शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार शिक्षण : खान्देशातील २७५७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

By admin | Updated: February 10, 2016 00:32 IST

जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे.

जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे. यंदा खान्देशात दुष्काळी परिस्थिती आहे. २०१५-२०१६ चा खरीप हंगाम ५० पैशापेक्षा कमी आहे. महसूल व वन विभागाच्या २० ऑक्टोबरला शासन निर्णयानुसार ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करावे, असे म्हटले आहे. याबाबत काही दिवसांपर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर मोर्चा नेत खरीप हंगामात ५० पैसे आणेवारी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचे सांगितले होते. त्याची दखल घेत, सहसंचालक डॉ. तुपे यांनी कुलसचिवांना पत्र लिहिले आहे. खान्देशातील दुष्काळी गावांची संख्या अशी : जळगाव- १२५८धुळे-६१४नंदुरबार- ८८५ शासन निर्णयानुसार विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतील, तर त्यांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्याचे पत्राद्वारे विद्यापीठाला कळविण्यात आले आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. - डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग