शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजच्या संस्कारांमुळे घडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:41 IST

​​​​​​​बदलापूरहून पहाटे ४.३०ची लोकल पकडून रुईया कॉलेज गाठत होते. ७ वाजताचे प्रॅक्टिकल करायचे.

रुईयामधील आठवणीबद्दल काय सांगशील?बदलापूरहून पहाटे ४.३०ची लोकल पकडून रुईया कॉलेज गाठत होते. ७ वाजताचे प्रॅक्टिकल करायचे. त्यानंतर १० वाजेपर्यंत जेवढी लेक्चर असतील त्यांना बसायचे. त्यानंतर एकांकिका, डान्स यांच्या तालमी करून रात्री १०.३०ची लोकल पकडून दीड वाजता घरी पोहोचायची. कॉलेजमध्ये दरदिवशी नवनवीन शिकायला मिळाले. लहान-लहान गोष्टींवर मोठमोठ्या चर्चा करायचो. रुईयामधील वेगवेगळे ‘डे’, स्पर्धा, प्रॅक्टिकल परीक्षा हे सर्व करताना खूप आनंद यायचा. प्र्रत्येकाची चेष्टा, मस्ती, चहा-कट्टा, भांडणे, प्रेम-मैत्री यात पाच वर्षे कशी गेली कळलेच नाही.रुईया आणि अभियन यांचा संबंध कसा आला?विंगेत उभे कसे राहायचे यापासून सुरुवात झाली. रुईयातील संतोष वेरुळकर, प्रताप फड, अभिजित खाडे, राजेश शिंदे, सचिन पाठक, नितीन जाधव, मंगेश दादा या सर्वांमुळे अभिनयाची रुची जडली. या सर्वांमुळे नाटक करायला तर शिकलेच, पण बघायलाही शिकले. एकांकिका, दीर्घांक, नाटक, शॉर्ट फिल्म्स, फिल्म्स या सगळ्यामध्ये सहभाग नोंदवला. पंकज चेंबूरकर आणि मृणाल चेंबूरकर यांच्या ग्रुपमधूनही नाटक करायचे. हे सगळे छंद म्हणून करत होते. पण त्यांचा करिअर म्हणून विचारसुद्धा याच लोकांनी करायला लावला. लेक्चर संपवून तालीम करायला सुरुवात करायचो. तालीम करीत असताना वेळ कसा आणि किती जायचा ते कळायचेच नाही. मग कधी कधी खूप उशीर व्हायचा. तेव्हा मित्रमैत्रणींच्या घरी मुक्काम करायची.लांबचा प्रवास, तालीम आणि अभ्यास कसा सांभाळला?मनामध्ये खूप जिद्द असल्यामुळे सर्वकाही करूनदेखील कधी थकवा जाणवला नाही. लोकलमध्ये प्रवास करीत असताना अभ्यास करायचे. परीक्षेच्या वेळी विंगेत अभ्यास करायची. नाटक सोबत असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक बळ कायम सोबत होते. त्यामुळे अभ्यास करताना कोणतीही अडचण आली नाही.कॉलेज कट्ट्यावर काय धमाल केली?रुईया कट्टा हा एक नॉस्टॅलजिक करणारी गोष्ट आहे. टाइमपास, हसणे-रडणे या सर्व गोष्टी कट्ट्यावर आम्ही केल्या. इथे नाटकासाठी नवे विषयही सुचले. वाट बघायला लावायलाही या कट्ट्याने शिकवले. रुईयामध्ये कमालीच्या मित्रमैत्रिणी भेटल्या. स्पृहा जोशी, सुखदा बर्वे, ऋतुजा बागवे, आशय तुलालवार यांची घरे आणि कुटुंबे तर जशी काही माझीच झाली आहेत. अभ्यासामधील शॉर्टकट मला मानसी महाजन, सागर देशपांडे, अमृता जोशी, दीप्ती अभ्यंकर यांनी शिकवले. त्यामुळे अनेक परीक्षा पास झाले. या सगळ्यांनी प्रेम केले, कौतुक केले, चेष्टा, मस्करी, भांडणे केली आणि खऱ्या अर्थाने दुनियादारी शिकवली.आतापर्यंत कोणकोणती पारितोषिके मिळाली?राजू तुलालवार यांच्या दिग्दर्शनातून अनेक बालनाट्ये केली. ‘ग म भ न’ ही माझी पहिली एकांकिका आणि त्यानंतर ‘कमला’ ही माझी पहिली मालिका. ‘ग म भ न’साठी आय.एन.टी., मृगजळ, सवाई या स्पर्धांमधून पारितोषिके मिळाली. ‘कमला’ मालिकेतील अभिनयासाठी दिग्गजांनी कौतुक केले. यासाठी मला संस्कृती कलादर्पणचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारदेखील मिळालाआहे.>कॉलेजविषयीकाय सांगशील?आदर्श विद्यामंदिर या माझ्या शाळेतून मला खूप काही शिकता आले. स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगण्याची प्रेरणा शाळेतूनच मिळाली. कॉलेजमध्ये असताना हाच आत्मविश्वास द्विगुणित झाला. सतर्कपणा आणि नम्रपणामुळे अभिनयाच्या पायºया चढण्यात यशस्वी होत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण झाले. रुईयाबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. आज मी ज्या पदावर आहे, त्यामध्ये माझ्या कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे. कलाकार म्हणून जितके घडले तेवढेच चांगली व्यक्ती होण्यासाठी कॉलेजमधील संस्कारांनी मदत केली. प्रत्येक वेळी कठीण परिस्थितीत उभे राहायला शिकवले. कॉलेजमध्ये राहून कॉलेजच्या बाहेरील जगातील ज्ञान आत्मसात करायला आणि जगण्याची कला महाविद्यायाने शिकविली.