शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

नरभक्षक वाघाची वनविभागाला हुलकावणी

By admin | Updated: January 31, 2017 01:51 IST

अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील

वनविभागाची झोप उडाली : अनेक उपाययोजना करुनही वाघ सापडेना मोहाळी (नलेश्वर) : अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अनेक गावात व शेतशिवारात नरभक्षक वाघाने महिन्याभरापासून धुमाकूळ घालून तीन महिलांना ठार तर दोन महिलांना जखमी केले आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावखेड्यात दहशत निर्माण झालेली असून त्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभाग विविध उपाय व योजना तयार करून त्याला कैद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र तो नरभक्षक वाघ वनविभागाला पाच दिवसांपासून सातत्याने हुुलकावणी देत असल्याने वनविभागाची झोप उडालेली आहे. अगदी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी नेहमीच वाघाच्या हल्ल्यात ठार होत असतात. मात्र अलिकडे एका नरभक्षक वाघाने सातत्याने महिन्याभरापासून गावात व शेतशिवारात धुमाकूळ घालून तीन महिलांना ठार तर दोन महिलांना गंभीररित्या जखमी केले. या घटनेने संपूर्ण सिंदेवाही तालुका दहशतीच्या सावटात आहे. आजही तो नरभक्षक वाघ गाव शेजारी व गावात येत असल्याने गाव खेड्यातील गावकरी रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर पडत नसल्याचे दिसून येते. तर या परिसरातील संपूर्ण रस्ते सायंकाळी ५ वाजतानंतर ओस पडू लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचेही शेतीचे कामे त्या नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे ठप्प पडलेले आहे. नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने विविध उपाय व योजना केल्यात. त्यात जवळपास १५० वन कर्मचारी व अधिकारी, वाघ जेरबंद करणारे तज्ज्ञ, ताडोबा प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी व त्याची चमू, तसेच वाघाला शुटरने गुंगीचे औषध देऊन त्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रंक्युलायझिंग शॉप शुटर हे वाघ पकडण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. परिसरात गस्त घालण्यासाठी जवळपास २० गाड्याचा ताफा, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गावात चार पिंजरे आणि त्यात एका पिंजऱ्यात बकरी, एका पिंजऱ्यात रेडा व दोन पिंजऱ्यात दोन कुत्रे ठेवण्यात आले आहेत तर दोन ठिकाणी मोकळ्या जागेत बकऱ्या बांधून ठेवल्याची माहिती सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी वसंत कामडी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शिवणी वनपरिक्षेत्रात तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून एका पिंजऱ्यात रेडा तर दोन पिंजऱ्यात बकऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तीन ठिकाणी पिंजऱ्याविनाच बकऱ्या बांधून ठेवल्याची माहिती एस.आर. लागडे यांनी दिली. तसेच गावातील वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली दहा युवकांची ३०० रुपये या प्रमाणे मजुरी देऊन गस्त घालण्यात येत आहे. तर दोन ठिकाणी मचानी उभारुन त्याद्वारे पाळत ठेऊन ट्रॅक्युलायझर शॉप शुटर तैनात ठेवले आहेत. असे अनेक उपाय व योजना करुनदेखील आज पाच दिवसांपासून त्या नरभक्षक वाघाने वनविभागाला हुलकावणी देत जवळपास दीडशे वनकर्मचारी व अधिकाऱ्यांची झोप उडवलेली आहे. वनविभागही रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करुन त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी गस्त घालीत आहे. त्यांच्या गस्तीने परिसरात सर्वत्र गाड्यांमुळे उडणारी धूळ दिसून येत आहे. जोपर्यंत तो नरभक्षक वाघ जेरबंद होत नाही, तोपर्यंत या वाघाची दहशत या परिसरात राहणार असल्याने गावकरी चिंतेत आहेत. या भीतीपोटीच अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प पडलेली आहेत. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)