शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विद्यापीठातील ६२ बंधार्‍यांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: February 4, 2016 00:06 IST

जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंधारे कोरडठाक पडले आहेत.

जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंधारे कोरडठाक पडले आहेत.
उच्च शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून बाहेरगावाहून आलेल्या व विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून विद्यापीठात ६२ बंधारे व ४ विहीरींची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, यावर्षी विहीरीतील पाणीही आटले आहे. पाऊस नसल्याने बंधार्‍यांमध्येही ठणठणाट आहे. त्यामुळे विद्यापीठात राहणार्‍या विद्यार्थ्यांनाही पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागतोय.
दीड हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सद्य:स्थितीत दीड हजार विद्यार्थी, तसेच १०४ कर्मचार्‍यांच्या क्वॉर्टरमध्ये विद्यापीठात काम करणारे कर्मचारी राहताहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व कर्मचार्‍यांच्या क्वार्टरमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
एकदाच दिले जाते पाणी
पूर्वी विद्यापीठातील बंधार्‍यांमध्ये समाधानकारक पाणी होते. त्यामुळे दिवसातून तीन वेळेस कर्मचार्‍यांचे क्वार्टर व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात दिवसातून तीन वेळेस पाणी सोडले जात होते. मात्र, आता दिवसभरातून एकदाच पाणी सोडले जात असल्याची माहिती कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी दिली आहे.
२५ लाख लिटर पाणी लागते
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सद्य:स्थितीत दिवसाला २५ लाख लीटर पाणी लागते. त्यात विद्यापीठात काही इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बर्‍याचदा बाहेरून टॅँकरने पाणी आणावे लागत आहे.
पाण्याची व्यवस्था हाच पर्याय
उमवित सोमवारी पत्रपरिषद आटोपली. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थी स्थलांतरास नकार देत असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कुलगुरू प्रा. मेश्राम म्हणाले, की पाण्यासाठी बोअरिंग केली. परंतु, पाणी लागले नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात ज्या प्रमाणे पाण्याची व्यवस्था केली आहे. तशी व्यवस्था आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे करणे आवश्यक आहे.