शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

विद्यापीठातील ६२ बंधार्‍यांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: February 4, 2016 00:06 IST

जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंधारे कोरडठाक पडले आहेत.

जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंधारे कोरडठाक पडले आहेत.
उच्च शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून बाहेरगावाहून आलेल्या व विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून विद्यापीठात ६२ बंधारे व ४ विहीरींची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, यावर्षी विहीरीतील पाणीही आटले आहे. पाऊस नसल्याने बंधार्‍यांमध्येही ठणठणाट आहे. त्यामुळे विद्यापीठात राहणार्‍या विद्यार्थ्यांनाही पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागतोय.
दीड हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सद्य:स्थितीत दीड हजार विद्यार्थी, तसेच १०४ कर्मचार्‍यांच्या क्वॉर्टरमध्ये विद्यापीठात काम करणारे कर्मचारी राहताहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व कर्मचार्‍यांच्या क्वार्टरमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
एकदाच दिले जाते पाणी
पूर्वी विद्यापीठातील बंधार्‍यांमध्ये समाधानकारक पाणी होते. त्यामुळे दिवसातून तीन वेळेस कर्मचार्‍यांचे क्वार्टर व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात दिवसातून तीन वेळेस पाणी सोडले जात होते. मात्र, आता दिवसभरातून एकदाच पाणी सोडले जात असल्याची माहिती कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी दिली आहे.
२५ लाख लिटर पाणी लागते
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सद्य:स्थितीत दिवसाला २५ लाख लीटर पाणी लागते. त्यात विद्यापीठात काही इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बर्‍याचदा बाहेरून टॅँकरने पाणी आणावे लागत आहे.
पाण्याची व्यवस्था हाच पर्याय
उमवित सोमवारी पत्रपरिषद आटोपली. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थी स्थलांतरास नकार देत असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कुलगुरू प्रा. मेश्राम म्हणाले, की पाण्यासाठी बोअरिंग केली. परंतु, पाणी लागले नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात ज्या प्रमाणे पाण्याची व्यवस्था केली आहे. तशी व्यवस्था आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे करणे आवश्यक आहे.