शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

ंआरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करा

By admin | Updated: July 15, 2015 00:14 IST

पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील शाळांमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गातील प्रवेशा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र,सुमारे तीन महिन्यांपासून बंद असलेली प्रवेश प्रकिया कशी राबविली जाईल,याबाबतचे वेळापत्रकच शिक्षण विभागाकडून जाहीर केले नाही,परिणामी शाळा व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील शाळांमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गातील प्रवेशा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र,सुमारे तीन महिन्यांपासून बंद असलेली प्रवेश प्रकिया कशी राबविली जाईल,याबाबतचे वेळापत्रकच शिक्षण विभागाकडून जाहीर केले नाही,परिणामी शाळा व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने 2015-16 या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळांकडे उपलब्ध असणा-या पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गातील उपलब्ध जागांची माहिती घेण्यात आली. या जागांवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांना लॅटरी पध्दतीने प्रवेश देण्यात आला. प्रवेश प्रकिया सुरू असताना आरटीई प्रवेश केवळ पहिलीच्या विद्यार्थ्यांना दिले जातील, असे राज्याच्या शिक्षण विभागाने अचानकपणे जाहीर केले. परिणामी प्रवेश प्रक्रिया बंद पडली. काही संस्थाचालकांनी व स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने थांबलेली प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
सामाजिक कार्यकर्ता हर्षद बर्डे म्हणाले, न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी पहिल्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी किती तारखेपर्यंत प्रवेश घ्यावेत. रिक्त जागांवरील प्रवेशासाठी लॉटरी केव्हा काढली जाईल, याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविली जाणार नाही.
पुणे महानगरपालिकेचे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, न्यायालय आणि शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे सर्व शाळांनी आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत,असा सुचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील.
चौकट -
न्यायालयाच्या आदेशानुसार थांबलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना सर्व संबंधित शिक्षण अधिका-यांना दिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. त्याच प्रमाणे शासनाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार आरटीई प्रवेशाबाबत तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत.परिणामी आरटीई प्रवेशासंदर्भातील पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.
- दिनकर टेमकर ,शिक्षण उपसंचालक ,प्राथमिक शिक्षण विभाग