शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जि.प.चे ‘सीईओ’ झाले कार्यमुक्त

By admin | Updated: June 29, 2016 01:01 IST

औरंगाबाद : डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सोडला.

औरंगाबाद : डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सोडला. ते गुरुवारी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे घेणार आहेत. दरम्यान, सायंकाळी जि.प. प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या वतीने त्यांना सपत्नीक समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. अवघ्या ३२ व्या वर्षी जिल्हाधिकारीपदावर विराजमान होणारे डॉ. अभिजित चौधरी हे १५ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर विराजमान झाले होते. जवळपास दीड वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अनेकदा त्यांना कठोर निर्णयही घ्यावे लागले. नियमबाह्य कामांसाठी आग्रह धरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना ‘हे काम करणे शक्य नाही’, अशा संयमी भाषेत सांगून समजूत घातली. प्रशासनावर त्यांचा वचक होता. फायलींवर चुकीच्या टिपण्या लिहिणे किंवा हस्तलिखितामध्ये फाईल सादर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी शिस्त लावली. या सर्व त्यांच्या कार्यप्रणालीचा अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच सदस्यांनी निरोप समारंभात आवर्जून उल्लेख केला. जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला डॉ. अभिजित चौधरी हे सपत्नीक उपस्थित राहिले. यावेळी व्यासपीठावर जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अजय जोशी, बांधकाम सभापती संतोष जाधव, समाजक ल्याण सभापती शीला चव्हाण, सदस्य रामदास पालोदकर, दीपक राजपूत, पुष्पा जाधव, मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तमराव चव्हाण, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, विविध कर्मचारी संघटनांचे नेते, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अभिजित चौधरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, जिल्हा परिषदेत काम करत असताना कसे दिवस गेले ते समजलेच नाही. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि सदस्यांचे मला चांगले सहकार्य मिळाले. ४ जेव्हा केव्हा जि.प.च्या सभा व्हायच्या. त्यानंतर ‘अधिकाऱ्यांना धारेवर धरले’ या आशयाच्या वर्तमानपत्रात बातम्या यायच्या. माझे एकच म्हणणे आहे की, चुकीचे काम करणारे अधिकारी- कर्मचाऱ्यांना तुम्ही घाम फोडायचे; पण जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीवरही शाबासकीची थाप मारण्यास कुचराई करू नका. ज्यामुळे ते चुकीचे काम करणार नाहीत. आणखी जोमाने चांगले काम करतील.