शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जि.प. शाळांवर टंचाईचे संकट

By admin | Updated: March 4, 2016 23:37 IST

परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे.

परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे. जिल्ह्यातील निम्म्या जि. प. शाळांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने मध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १४८ प्राथमिक शाळा असून ३६६ खाजगी अनुदानित, ४५६ विना अनुदानित अशा १ हजार ९७१ शाळा आहेत. त्यापैकी शासकीय ९९४, खाजगी अनुदानित ३६६ तर ४५३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये युडायसनुसार पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतु, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका या शाळांनाही बसत आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी खालावल्यामुळे शाळांमधील बोअर, हातपंप कोरडेठाक पडले आहेत. गावातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे शाळांमध्येही पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती शाळांना पाणीटंचाईचा फटका बसला याची आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही़ शिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा फंड नसल्याने कोणत्या फंडातून पाणी उपलब्ध करून द्यायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनास पडला आहे़ त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फतच शाळांमध्ये पाणी उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घेण्यासंदर्भातही जिल्हा शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)