शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जि.प. शाळांवर टंचाईचे संकट

By admin | Updated: March 4, 2016 23:37 IST

परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे.

परभणी : जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला आहे. जिल्ह्यातील निम्म्या जि. प. शाळांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने मध्यान्ह भोजन योजनेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १४८ प्राथमिक शाळा असून ३६६ खाजगी अनुदानित, ४५६ विना अनुदानित अशा १ हजार ९७१ शाळा आहेत. त्यापैकी शासकीय ९९४, खाजगी अनुदानित ३६६ तर ४५३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये युडायसनुसार पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतु, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका या शाळांनाही बसत आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी खालावल्यामुळे शाळांमधील बोअर, हातपंप कोरडेठाक पडले आहेत. गावातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे शाळांमध्येही पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किती शाळांना पाणीटंचाईचा फटका बसला याची आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही़ शिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा फंड नसल्याने कोणत्या फंडातून पाणी उपलब्ध करून द्यायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनास पडला आहे़ त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फतच शाळांमध्ये पाणी उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घेण्यासंदर्भातही जिल्हा शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)