शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

जि.प. जागांचे होणार पुनर्मूल्यांकन !

By admin | Updated: April 11, 2017 00:10 IST

लातूरजिल्हा परिषदेत भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर नवे फर्मान सोडत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत

हरी मोकाशे  लातूरजिल्हा परिषदेत भाजपाने आपली सत्ता स्थापन केल्यानंतर नवे फर्मान सोडत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी सांगत असले तरी करार पद्धतीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागांची माहिती त्यातून मिळवायची आहे. तसेच आजच्या दराच्या तुलनेनुसार भाडे मिळत आहे की नाही, हेही जाणून घेतले जाणार आहे. परिणामी, पुनर्मूल्यांकन होण्याबरोबर भाडे दरात वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.लातूर जिल्ह्याची निर्मिती १९८२ साली झाली. तत्पूर्वी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्याअंतर्गत होता. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता राहिली आहे. परंतु, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव करून सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, सत्तेवर विराजमान होताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जिल्हा परिषद प्रशासनास आपल्या ताब्यातील जागा व इमारतीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. जि.प. मालकीच्या इमारती व जागा करार पद्धतीने स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांना भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता आजपर्यंत काँग्रेसची जिल्हा परिषदेवर सत्ता राहिल्याने जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती व जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या संस्थांच्या ताब्यात करार पद्धतीने अल्पदरात असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.