शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ विसरूच शकत नाही

By admin | Updated: June 28, 2016 00:51 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत जवळपास दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात बरेच काही शिकता आले.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत जवळपास दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात बरेच काही शिकता आले. विशेष म्हणजे आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेली ‘मेगा भरती’ ही अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीत झाली. गावभेटींचा अनोखा उपक्रम यशस्वी राहिला. याशिवाय अन्य शासकीय सेवेत शिकता आले नसते ते इथे आपणास शिकता आले, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले. डॉ. अभिजित चौधरी यांनी १५ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. जवळपास दीड वर्ष त्यांनी जि.प.चा कारभार सांभाळला. आता त्यांना बढती मिळाली असून ते भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले आहेत. ‘क्या खोया, क्या पाया’ या विषयावर त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एकीकडे जिल्हाधिकारी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता, तर दुसरीकडे नियोजित उपक्रम राबविण्यापूर्वीच बदली झाल्याचे दु:खही ते लपवू शकले नाहीत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२४ जि. प. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वत:बरोबरच सर्व अधिकाऱ्यांना त्या दत्तक दिल्या होत्या. याप्रमाणे मोमबत्ता तलावामध्ये ‘बोटिंग’चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तलावाच्या ठिकाणी बांधकामास सुरुवात झाली; पण मार्चअखेर बोटी खरेदी करण्यासंबंधीची ई- निविदा निघाली नसल्यामुळे त्याबाबत शासनाची परवानगी घेतली जाणार आहे. पदाधिकारीही कधी विकासकामांच्या आड आले नाहीत. औरंगाबाद जि.प.चा कार्यकाळ मी कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार डॉ. चौधरी यांनी काढले. सिंचन, समाजकल्याण तसेच शिक्षण विभागाला सक्षम अधिकारी हवेत. अलीकडे शिक्षणाधिकारी मोगल यांनी कामामध्ये गती घेतली आहे. सक्षम अधिकारी मिळत नसल्यामुळे त्या विभागांची नेहमी ओरड होते. दुसरीकडे महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम, आरोग्य या विभागाची कामगिरी बरी आहे. जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत उभारणीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण त्यासंबंधी काही करू शकलो नाही.मालमता विकसित केल्याशिवाय आर्थिक स्रोत बळकट करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे आपण कर्मचारी कल्याण निधीसंबंधी निर्णय घेऊ शकलो नाही. बदनामीकारक आरोप केले जातात म्हणून अधिकारीही निर्णय घेऊ शकत नाहीत, असे डॉ. चौधरी म्हणाले.