शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचवणार!

By admin | Updated: January 1, 2015 00:27 IST

संजय तिपाले , बीड शासकीय योजनांची कोटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच दुष्काळी स्थितीशी खंबीरपणे सामना करण्ण्याचे आव्हान कायम आहे.

संजय तिपाले , बीडशासकीय योजनांची कोटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच दुष्काळी स्थितीशी खंबीरपणे सामना करण्ण्याचे आव्हान कायम आहे. जिल्हा परिषदेचा कारभार स्वच्छ व गतिमान करायचा आहे. त्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी नुतन वर्षातील संकल्पांचा ‘अजेंडा’ ‘लोकमत’जवळ मांडला.सरत्या वर्षात मिनीमंत्रालय विधायक कामांनी कमी अन् घोटाळ्यांनीच अधिक चर्चेत राहिले. दीड महिन्यांपूर्वी सीईओ म्हणून लातूर येथून आलेल्या नामदेव ननावरे यांनी शिस्त व स्वच्छ कारभाराचे ‘धडे’ कर्मचाऱ्यांना दिले. सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत काम करुन त्यांनी छाप सोडली आहे. नव्या वर्षात करण्यासारखे खूप आहे;परंतु शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणे व दुष्काळी उपायोजना करणे ही कामे प्राधान्याने करावयाची आहेत. जिल्हा शौचालय बांधकामात पिछाडीवर आहे. अनुदान सहा हजाराहून १२ हजारापर्यंत वाढले आहे. घर तिथे शौचलय झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. १) निर्मल भारत अभियानच्या आराखड्यातील १०५ गावांमध्ये पोहोचून शौचालय उभारण्यासंदर्भात जनजागृती केली जाईल. अधिकाऱ्यांना गावे वाटून दिली असून काही गावांत शौचालय बांधकामास प्रारंभही केला जाणार आहे. जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण कमी आहे. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी जनजागृती करुन उपाय करायचे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास रुग्णसेवा द्यायची आहे. शिक्षण विभागात गुणवत्ता वाढीवर भर दिला जाणार आहे, असेही ननावरे म्हणाले.