शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

जिल्हा परिषदेतील भाजपा विजय लातुरात लोकशाही रुजल्याचे प्रतीक

By admin | Updated: February 25, 2017 00:32 IST

लातूर : जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतरही निलंगेकर आणि देशमुख यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही.

लातूर : जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतरही निलंगेकर आणि देशमुख यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही. जिल्हा परिषदेतील मोठ्या विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकरांनी देशमुखांवर थेट हल्लाबोल करताना ‘या जिल्ह्यात आमच्याशिवाय कुणी नाही, असा समज पसरविण्यात आला होता. दुसरे कुणी आले तर त्यांची हेटाळणी व उपहास केला जायचा. आता जिल्हा परिषदेत झालेला आमचा हा विजय म्हणजे लातुरात लोकशाही अवतरल्याचे प्रतीक’ असल्याचे सांगून इंग्रज, निजामानंतर लातुरात आत्ताच लोकशाही रुजल्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत शुक्रवारी केले. आता या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते, याची उत्सुकता आहे.पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आमदार दिलीपराव देशमुख यांच्यात जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आमदार अमित देशमुख यांनीही निलंगेकरांवर प्रहार केले होते. त्यानंतर निलंगेकरांनीही पलटवार केले होते. निवडणुका झाल्या तरी यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेईनासा झाला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीरावांनी देशमुखांच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केल्या. ते म्हणाले की, आधी आपण इंग्रजांच्या गुलामीतून ४७ ला स्वतंत्र झालो. नंतर एक वर्षानंतर निजामापासून स्वतंत्र झालो. पण लातूरकरांना जिल्हा परिषदेनंतर आत्ता लोकशाही रुजल्याचे सांगणारे आहे. हा भाजपाचा विजय सांघिक यश आहेच, त्याशिवाय सामान्य लोकांचा विजय आहे. राज्य सरकारने केलेल्या कामाची दखल घेऊन लोकांनी आम्हाला निवडून दिले. ३६ ते ४२ असा आमचा अंदाज होता. पण आमच्या चार ते पाच जागा का गमावल्या यावर आम्ही मंथन करीत आहोत.