शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील भाजपा विजय लातुरात लोकशाही रुजल्याचे प्रतीक

By admin | Updated: February 25, 2017 00:32 IST

लातूर : जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतरही निलंगेकर आणि देशमुख यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही.

लातूर : जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतरही निलंगेकर आणि देशमुख यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही. जिल्हा परिषदेतील मोठ्या विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकरांनी देशमुखांवर थेट हल्लाबोल करताना ‘या जिल्ह्यात आमच्याशिवाय कुणी नाही, असा समज पसरविण्यात आला होता. दुसरे कुणी आले तर त्यांची हेटाळणी व उपहास केला जायचा. आता जिल्हा परिषदेत झालेला आमचा हा विजय म्हणजे लातुरात लोकशाही अवतरल्याचे प्रतीक’ असल्याचे सांगून इंग्रज, निजामानंतर लातुरात आत्ताच लोकशाही रुजल्याचे वक्तव्य पत्रकार परिषदेत शुक्रवारी केले. आता या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते, याची उत्सुकता आहे.पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आमदार दिलीपराव देशमुख यांच्यात जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आमदार अमित देशमुख यांनीही निलंगेकरांवर प्रहार केले होते. त्यानंतर निलंगेकरांनीही पलटवार केले होते. निवडणुका झाल्या तरी यांच्यातील कलगीतुरा थांबायचे नाव घेईनासा झाला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीरावांनी देशमुखांच्या कार्यपध्दतीवरच शंका उपस्थित केल्या. ते म्हणाले की, आधी आपण इंग्रजांच्या गुलामीतून ४७ ला स्वतंत्र झालो. नंतर एक वर्षानंतर निजामापासून स्वतंत्र झालो. पण लातूरकरांना जिल्हा परिषदेनंतर आत्ता लोकशाही रुजल्याचे सांगणारे आहे. हा भाजपाचा विजय सांघिक यश आहेच, त्याशिवाय सामान्य लोकांचा विजय आहे. राज्य सरकारने केलेल्या कामाची दखल घेऊन लोकांनी आम्हाला निवडून दिले. ३६ ते ४२ असा आमचा अंदाज होता. पण आमच्या चार ते पाच जागा का गमावल्या यावर आम्ही मंथन करीत आहोत.