शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जिल्हा परिषदेचे आता ६२ गट

By admin | Updated: August 20, 2016 01:13 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील. सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची फेररचना केली आहे. सध्या जिल्हा परिषदेचे ६० गट असून, पंचायत समितीचे १२० गण कार्यरत आहेत. नव्या फेररचनेनुसार औरंगाबादलगतचे सातारा व देवळाई हे गट महापालिकेत तर फुलंब्री व सोयगाव हे नगरपंचायतमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे हे चारही गट कमी न होता त्यांच्या लगत असलेल्या मोठ्या गावांना गटाचा दर्जा मिळेल. नव्या फेररचनेत औरंगाबाद, पैठण आणि वैजापूर या तीन तालुक्यांत (पंचायत समिती) प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे. असे असले तरी कन्नड तालुक्यातील एक गट कमी झाला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ६२ सदस्यांपैकी ३१ महिला सदस्यांना निवडून द्यावे लागेल. यामध्ये खुल्या प्रवर्गातील १६ महिला, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४ महिला, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २ महिला आणि ओबीसी प्रवर्गातील ९, अशा ३१ महिला सदस्यांचा समावेश राहील. याशिवाय खुल्या प्रवर्गातील १८ पुरुष सदस्य, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४, अनुसूचित जमाती प्रवर्गाचा १ सदस्य आणि ओबीसी प्रवर्गाचे ८, असे एकूण ३१ सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत.