शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

जिल्हा परिषदेचे आता ६२ गट

By admin | Updated: August 20, 2016 01:13 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये दोनने वाढ झाली असून, पंचायत समितीचे ४ गण वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जि.प.चे ६२, तर पंचायत समितीचे १२४ सदस्य निवडून येतील. सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची फेररचना केली आहे. सध्या जिल्हा परिषदेचे ६० गट असून, पंचायत समितीचे १२० गण कार्यरत आहेत. नव्या फेररचनेनुसार औरंगाबादलगतचे सातारा व देवळाई हे गट महापालिकेत तर फुलंब्री व सोयगाव हे नगरपंचायतमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे हे चारही गट कमी न होता त्यांच्या लगत असलेल्या मोठ्या गावांना गटाचा दर्जा मिळेल. नव्या फेररचनेत औरंगाबाद, पैठण आणि वैजापूर या तीन तालुक्यांत (पंचायत समिती) प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे. असे असले तरी कन्नड तालुक्यातील एक गट कमी झाला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ६२ सदस्यांपैकी ३१ महिला सदस्यांना निवडून द्यावे लागेल. यामध्ये खुल्या प्रवर्गातील १६ महिला, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४ महिला, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २ महिला आणि ओबीसी प्रवर्गातील ९, अशा ३१ महिला सदस्यांचा समावेश राहील. याशिवाय खुल्या प्रवर्गातील १८ पुरुष सदस्य, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४, अनुसूचित जमाती प्रवर्गाचा १ सदस्य आणि ओबीसी प्रवर्गाचे ८, असे एकूण ३१ सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत.