शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सवतासुभा

By admin | Updated: December 16, 2015 00:17 IST

औरंगाबाद : जि.प. आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांना एकाच विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येते.

औरंगाबाद : जि.प. आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांना एकाच विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येते. पाच वर्षांच्या कालावधीनंतर अशा कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांतर्गत स्थानांतर करावे, असा नियम आहे; पण या नियमाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक विभागांमध्ये अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला सवतासुभा निर्माण केला आहे. जि.प. किंवा पं.स. कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल, तर त्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले पाहिजेत. शिवाय, एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांचे विभाग बदलून त्यांना पदस्थापना देणे गरजेचे असते. ज्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये पारदर्शकता आणि गती येते. मात्र, यंदा प्रशासनाने अंतर्गत बदलाच्या फायलींकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक कर्मचारी निर्ढावले असून ते अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. विविध कामांच्या फायली निकाली काढण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब लावतात. अधिकाऱ्यांनी निकाली काढलेल्या फायली दाबून ठेवतात. ‘चिरीमिरी’ घेतल्याशिवाय हे कर्मचारी फायली पुढे सरकवत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा जि.प. प्रशासनाविरोधी रोष वाढला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे घेतली आणि अंतर्गत बदलाच्या फायलींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे, जून-जुलै महिन्यामध्ये एका टेबलवर ३ वर्षांपेक्षा जास्त आणि एका विभागात ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षित अंतर्गत बदलाच्या फायली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर पडून आहेत, असे बदल झाल्यास अनेक वर्षांपासून अडगळीला पडलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य प्रशासकीय प्रवाहात येण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.