शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सवतासुभा

By admin | Updated: December 16, 2015 00:17 IST

औरंगाबाद : जि.प. आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांना एकाच विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येते.

औरंगाबाद : जि.प. आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांना एकाच विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येते. पाच वर्षांच्या कालावधीनंतर अशा कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागांतर्गत स्थानांतर करावे, असा नियम आहे; पण या नियमाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक विभागांमध्ये अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला सवतासुभा निर्माण केला आहे. जि.प. किंवा पं.स. कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल, तर त्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले पाहिजेत. शिवाय, एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांचे विभाग बदलून त्यांना पदस्थापना देणे गरजेचे असते. ज्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये पारदर्शकता आणि गती येते. मात्र, यंदा प्रशासनाने अंतर्गत बदलाच्या फायलींकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक कर्मचारी निर्ढावले असून ते अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. विविध कामांच्या फायली निकाली काढण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब लावतात. अधिकाऱ्यांनी निकाली काढलेल्या फायली दाबून ठेवतात. ‘चिरीमिरी’ घेतल्याशिवाय हे कर्मचारी फायली पुढे सरकवत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा जि.प. प्रशासनाविरोधी रोष वाढला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे घेतली आणि अंतर्गत बदलाच्या फायलींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे, जून-जुलै महिन्यामध्ये एका टेबलवर ३ वर्षांपेक्षा जास्त आणि एका विभागात ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षित अंतर्गत बदलाच्या फायली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर पडून आहेत, असे बदल झाल्यास अनेक वर्षांपासून अडगळीला पडलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य प्रशासकीय प्रवाहात येण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.