शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तरुणाचे अपहरण, पाच आरोपींना जामीन

By admin | Updated: June 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. सागर महादेव कदम याचे शुक्रवारी निराला बाजार येथून दुपारी पाच जणांनी अपहरण केले होते. आरोपींनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून सातारा परिसरातील सूर्या लॉन्सच्या मागे असलेल्या बंगल्यात आणले. तेथे आणखी एका कारमधून काही तरुण आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर ते त्याला सातारा पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अमित गिरधर मिसाळ (२०, रा. पृथ्वीनगर, सातारा परिसर), नईम पटेल अय्युब पटेल (२२, रा. ऊर्जानगर, सातारा परिसर) आणि विशाल रामदास गायके (२०, रा. गजानननगर, गारखेडा परिसर), अशोक परदेशी आणि अन्य एका महिलेला रात्री उशिरा अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येऊन पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडी मागितली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केल्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले.