शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

तरुणाचे अपहरण, पाच आरोपींना जामीन

By admin | Updated: June 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. सागर महादेव कदम याचे शुक्रवारी निराला बाजार येथून दुपारी पाच जणांनी अपहरण केले होते. आरोपींनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून सातारा परिसरातील सूर्या लॉन्सच्या मागे असलेल्या बंगल्यात आणले. तेथे आणखी एका कारमधून काही तरुण आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर ते त्याला सातारा पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अमित गिरधर मिसाळ (२०, रा. पृथ्वीनगर, सातारा परिसर), नईम पटेल अय्युब पटेल (२२, रा. ऊर्जानगर, सातारा परिसर) आणि विशाल रामदास गायके (२०, रा. गजानननगर, गारखेडा परिसर), अशोक परदेशी आणि अन्य एका महिलेला रात्री उशिरा अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येऊन पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडी मागितली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केल्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले.