शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तरुणाईची सुरक्षा ‘पाण्यात’!

By admin | Updated: June 2, 2015 00:36 IST

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे. यामध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक असली तरी एकाही जलतरण तलावावर सुरक्षेसंबंधीचे उपाय करण्यात आले नाहीत. रविवारी हर्सूल तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील सर्वच जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानाच्या पाठीमागे जलतरण तलाव चालविण्यात येतो. त्याचप्रमाणे ज्योतीनगर येथेही मनपाच्या जागेवर बीओटीवर जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. हर्सूल येथेही खाजगी जलतरण तलाव अलीकडेच सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पाचपेक्षा अधिक तलाव आहेत. बहुतांश तलावांवर नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. नवीन पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मागण्यात येत नाही. अनेकांना फिटस्चा त्रास असतो. तलावावर येणारे तरुण याची माहितीच देत नाहीत. त्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडतात. मनपा हद्दीत सुरू असलेल्या जलतरण तलावांसाठी प्रशासनाने कोणतीही नियमावली आजपर्यंत तयार केलेली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जलतरण तलाव चालविणाऱ्यांवर कोणचाही अंकुश राहिलेला नाही. पोेहण्याची हौस अनेकांना असते. या हौसेखातर मित्रांसोबत अनेक जण येतात. आल्यानंतर पोहता येते किंवा नाही याचीही माहिती देत नाहीत. येत नसेल तर लहान हौदात पोहत नाहीत. थेट मोठ्या हौदात जाण्याचा प्रयत्न करतात. लाईफ गार्ड किंवा प्रशिक्षकाची मदत अनेक जण घेतच नाहीत. सोबत आलेल्यांच्या भरवशावर पोहण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेकदा दुर्घटना होण्याची शक्यता असते. नागरिकांनीही अधिक काळजी घेतल्यास दुर्घटना घडणारच नाही. -धनंजय फडके, प्रशिक्षक