शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईची सुरक्षा ‘पाण्यात’!

By admin | Updated: June 2, 2015 00:36 IST

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे. यामध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक असली तरी एकाही जलतरण तलावावर सुरक्षेसंबंधीचे उपाय करण्यात आले नाहीत. रविवारी हर्सूल तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील सर्वच जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानाच्या पाठीमागे जलतरण तलाव चालविण्यात येतो. त्याचप्रमाणे ज्योतीनगर येथेही मनपाच्या जागेवर बीओटीवर जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. हर्सूल येथेही खाजगी जलतरण तलाव अलीकडेच सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पाचपेक्षा अधिक तलाव आहेत. बहुतांश तलावांवर नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. नवीन पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मागण्यात येत नाही. अनेकांना फिटस्चा त्रास असतो. तलावावर येणारे तरुण याची माहितीच देत नाहीत. त्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडतात. मनपा हद्दीत सुरू असलेल्या जलतरण तलावांसाठी प्रशासनाने कोणतीही नियमावली आजपर्यंत तयार केलेली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जलतरण तलाव चालविणाऱ्यांवर कोणचाही अंकुश राहिलेला नाही. पोेहण्याची हौस अनेकांना असते. या हौसेखातर मित्रांसोबत अनेक जण येतात. आल्यानंतर पोहता येते किंवा नाही याचीही माहिती देत नाहीत. येत नसेल तर लहान हौदात पोहत नाहीत. थेट मोठ्या हौदात जाण्याचा प्रयत्न करतात. लाईफ गार्ड किंवा प्रशिक्षकाची मदत अनेक जण घेतच नाहीत. सोबत आलेल्यांच्या भरवशावर पोहण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेकदा दुर्घटना होण्याची शक्यता असते. नागरिकांनीही अधिक काळजी घेतल्यास दुर्घटना घडणारच नाही. -धनंजय फडके, प्रशिक्षक