शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी देशाला मजबूत करावे

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : संपूर्ण देशात जेथे सर्वाधिक देशभक्ती दिसून येते, असे महाराष्ट्र राज्य आहे. येथील ही देशभक्तीची शक्ती संपूर्ण देशाला मजबूत करीत आहे.

औरंगाबाद : संपूर्ण देशात जेथे सर्वाधिक देशभक्ती दिसून येते, असे महाराष्ट्र राज्य आहे. येथील ही देशभक्तीची शक्ती संपूर्ण देशाला मजबूत करीत आहे. संस्कृती, परंपरा कायम राहिली पाहिजे. युवकांनी मी भारतीय आहे असा विचार करावा आणि देशाला मजबूत करावे, असे आवाहन अ.भा. दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी केले.देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बिट्टा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रदीप चव्हाण, मोहन सावंत, अविनाश येळीकर, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. यावेळी बिट्टा म्हणाले, कोणी डॉक्टर बनण्यासाठी, तर कोणी इंजिनिअर बनण्यासाठी शिक्षण घेत आहे; परंतु जे शिक्षण घेत आहोत, त्यातून देशाचे नाव संपूर्ण जगात कसे होईल, याचा विचार करावा आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. युवकांनी देशाचा इतिहास वाचला पाहिजे. आजच्या पिढीसाठी काय काय केले आहे, हे त्यातून कळेल. देशाला दहशतवादापासून कसे मुक्त करायचे, हा आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले राजकीय लोक आणि आजचे राजकीय लोक यांच्या विचारसरणीत बदल झालेला दिसतो; परंतु सगळेच वाईट नाहीत, असे ते म्हणाले. प्रारंभी शहीद जवानांच्या नातेवाईकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.सीमा सुरक्षेचा प्रश्नचीन, बांगलादेश, पाकिस्तान देशात घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तसेच दहशतवाद्यांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड अथवा जन्मठेप सुनावण्यात यावी, यासाठी दहशतवादविरोधी लष्करी न्यायालय स्थापन करण्याची गरज आहे. जे दहशवाद्यांना मदत करतील, त्यांनाही यानुसारच शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत बिट्टा यांनी दिली. आंदोलकांनी आपल्या कार्यातच राहिले पाहिजे. आंदोलक राजकारणात आले तर काय होते हे दिसून आले आहे. काँग्रेस आपली आई असल्याचेही ते यावेळी म्हणाले.