शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

युवकांनी भगतसिंहांचा आदर्श जपावा

By admin | Updated: August 24, 2014 01:11 IST

हिंगोली : वीर भगतसिंह यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन प्रदीप सोळुंके यांनी हिंगोलीत व्यक्त केले.

हिंगोली : युवाशक्तीवर भारत महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविले जात आहे; परंतु सशक्त व समुद्ध भारत निर्मितीसाठी वीर भगतसिंह यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन परिषदेचे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी हिंगोलीत व्यक्त केले. हिंगोलीत महावीर भवनमध्ये २३ आॅगस्ट रोजी वीभविपच्या परिषदेचे उद्घाटन आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रदीप सोळुंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष राजू गोडबान, डॉ. संतोष टारफे, अजीत मगर, भागवत मापारी, पवन पारवे, मिलेश मिसाळ, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, हाश्मी, विजय पाटील, तुषार देशमुख व स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सोळुंके यांनी ‘विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, समस्या व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, भगतसिंहांचा एकच नारा होता की, आम्हाला सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी त्यांनी आपले प्राणही दिले. युवकांनी समृद्ध भारत देश बनविण्यासाठी स्वत:पासून सुरूवात केली पाहिजे. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गुंडगिरी न करता कॉलेज, ग्रंथालये बंद राहणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे. जेणेकरून खूप शिक्षण घेऊनच तुम्ही प्रगती साधू शकाल, नसता माणूस किती मोठा आहे, याला अर्थ नाही, तो कसा आहे हे महत्वाचे आहे. यावेळी आ.गोरेगावकर म्हणाले, आम्ही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा संस्कार हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. समाजात वावरताना लौकिक मिळवायचा असेल तर आम्ही महापुरूषांच्या विचारांची कास धरली पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नसल्याचे ते म्हणाले.सूत्रसंचालन राज कऱ्हाळे यांनी तर आभार बालाजी पारोकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, डॉ. प्रिती कल्याणकर, शिवराज सरनाईक, बालाजी पारोकर, सुनील चौधरी, राज कऱ्हाळे, सुधीर पाटील, आकाश मुळे, गजानन इंगोले, नारायण लोंढे आदींनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)