शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:56 IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोलपंपांवर व कॉलेज टू कॉलेज जाऊन पत्रके वाटणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली असून, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोलपंपांवर व कॉलेज टू कॉलेज जाऊन पत्रके वाटणार आहेत. ही मोहीम आजपासून औरंगाबादेत व हळूहळू महाराष्टÑभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.त्यांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे जनतेत प्रचंड असंतोष खदखदतोय. यासाठी आता युवक काँग्रेस आक्रमक कार्यक्रम हाती घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे ५० हजार पत्रके एकट्या औरंगाबादेत वाटून मोठी जनजागृती करणार आहे.२०१०-१३ या कालावधीत आंतरराष्टÑीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती १२० ते १५० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारने जनतेच्या भल्याचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट होऊन ते दर ५५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. असे असतानाही ८० रु. लिटर पेट्रोलचा दर आकारून सरकारने जनतेची लूट चालविली आहे. गेल्या दोन वर्षांत कच्च्या तेलाच्या दरात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत फारसा फरक पडलेला नाही. तरीही पेट्रोलचा दर तब्बल २० रुपयांहून अधिक वाढला. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली ही लूट आणखी किती काळ सहन करायची? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, सरकारने आंतरराष्टÑीय दराप्रमाणे दररोज इंधन दर बदलत राहणार, अशी पद्धती स्वीकारली आणि त्याच्या नावाखाली अवघ्या ७२ दिवसांत पेट्रोलचे दर १६ रुपयांनी वाढवून टाकले. १ जुलै २०१७ रोजी ६३ रु. प्रतिलिटर असणारे पेट्रोल आज ८०-८१ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. डिझेलच्या बाबतीत असेच झाले आहे. नोटाबंदी व जीएसटीमध्ये आलेले अपयश लपविण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारत नाही म्हणून सरकार जनतेकडून कराची तुघलकी वसुली करीत आहे.आता दारूची दुकाने चालू झाली आहेत. त्यामुळे महाराष्टÑ सरकारने लावलेले उपकर तात्काळ मागे घेतले पाहिजे व पेट्रोलवर जीएसटी लावून दर तात्काळ कमी करण्यात आले पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी तांबे यांनी केली.पत्रपरिषदेस प्रदेश प्रतिनिधी जितेंद्र देहाडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, अकिल पटेल, मोईन इनामदार, खालेद पठाण, सलमान पटेल, आमेर अब्दुल सलीम, कमलेश कामिटे, सोनू पाईकडे, इम्रान पटेल, इद्रीस नवाज खान आदींची उपस्थिती होती.