शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

राष्ट्रीयीकृत बँकाकडून युवकांना असहकार्य

By admin | Updated: December 15, 2014 00:47 IST

शिरीष शिंदे , बीड व्यवसाय व उद्योगासाठी बेरोजगार युवक जिल्हा उद्योग केंद्रात प्रकरणे दाखल करतात मात्र त्यांच्यासाठी असलेला नियम डावलून राष्ट्रीयकृत बँका तारण किंवा गहाण खताची अट

शिरीष शिंदे , बीडव्यवसाय व उद्योगासाठी बेरोजगार युवक जिल्हा उद्योग केंद्रात प्रकरणे दाखल करतात मात्र त्यांच्यासाठी असलेला नियम डावलून राष्ट्रीयकृत बँका तारण किंवा गहाण खताची अट घालून कर्ज देण्यास नकार करत असल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे हजारो बेरोजगारांच्या हाताला कामच मिळत नाही. जिल्हा उद्योग मंडळातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमार्तंगत ५ लाख रुपयापर्यंतची प्रकरणे दाखल करणाऱ्यांना कर्ज घेताना जामिनदार देण्याची गरज नाही तसेच तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. शिक्षणाची अट नसल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकरणे दाखल करणाऱ्यांची संख्या अधीक आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकाना सदरील योजनेची प्रकरणे पाठवली जातात मात्र ते मंजुर होत नाहीत. बँकेत प्रकरणे दाखल झाल्यानंतर बँक मॅनेजर त्यांचे नियम लावत मंजुरीस अडथळा निर्माण करतात. दरम्यान, बीड जिल्हा हा औद्यागिक दृष्ट्या मागासला असून येथे मोठ-मोठे उद्योगधंदे किंवा कंपन्या नाहीत. यामुळे बेरोजगारांची संख्या अधिक आहे. युवक उद्योगाकडे वळत आहेत. दर वर्षी जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज प्रकरणे दाखल होण्याची संख्या वाढत आहे. यावर्षीही शासनाने जिल्हा उद्योग केंद्र व बँकाना दिलेल्या प्रकरणपेक्षा तिप्पट कर्ज प्रकरणे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात दर वर्षी पाऊस कमी पडत आहे. त्यामुळे रोजगार बंद होत चालले आहे. ज्यांच्या हाताला काम होते तेही आता बेरोजगार झाले आहेत. परिणामी स्वत: रोजगार उपलब्ध करण्यासाठी उद्योग व व्यवसायाकडे वळत आहेत. या वर्षी अधिक प्रकरणे दाखल झाली आहेत. प्रकरणे दाखल होण्याची संख्या वाढतच चालली असल्याचे समजते.४उद्योग व व्यापार करण्यासाठी युवकांना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने अनुदान दिले जाते. जुन्या योजनांसाठी अनुदान दिले जायचे ते अनुदान आता बंद होत चालले आहे. नव्या योजनांमध्ये उद्योग केंद्राच्यावतीने दिले जाणारे कर्ज हे व्याज स्वरुपात आहे. तीन योजना सोडल्या तर इतर योजनांमार्फत उद्योग केंद्राच्यावतीने दिले जाणारे अनुदान दहा ते पंधरा टक्के असते.