शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आपल्या वाहनावर दंड तर नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:02 IST

ई-चालानची माहिती मिळेना : मोबाइल नंबर नमूद नसणे, चुकीचा नंबर टाकण्याचा परिणाम औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग केला, तर ...

ई-चालानची माहिती मिळेना : मोबाइल नंबर नमूद नसणे, चुकीचा नंबर टाकण्याचा परिणाम

औरंगाबाद : वाहतूक नियमांचा भंग केला, तर आता वाहतूक पोलिसांकडून ई-चालान देण्यात येते. वाहनाची नोंदणी करताना आपला मोबाइल नंबर नमूद करणे गरजेचे असते; परंतु वाहन नोंदणीच्या वेळी रकान्यात मोबाइल नंबर नमूद न करणे, नंतर मोबाइल नंबर बदलणे, अशा कारणांनी ई-चालानची माहितीच वाहनचालकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यातून दंडाची थकबाकीही वाढत जाते. मग, जेव्हा वाहतूक पोलीस पकडतात आणि जुन्या ई-चालानचे आकडे सांगतात, तेव्हा दंडाची रक्कम ऐकून धक्का बसण्याची वेळ वाहनचालकांवर येऊ शकते. त्यामुळे आपल्या वाहनावर दंड तर नाही ना, याची वाहनचालकांनी वेळीच खातरजमा करुन घेतलेली बरी.

------

१७ हजार वाहनधारकांनी थकविला दंड

ई-चालान दिल्यानंतर शहरात तब्बल १७ हजार २६१ वाहनधारकांनी दंड थकविला. यात गेल्या दोन दिवसात ३ हजार ९७३ वाहनचालकांकडून तडजोड करून २९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ई-चालान दिले, मात्र त्याची माहितीच वाहनचालकांपर्यंत पोहोचली नसल्याने दंड भरला जात नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आता स्वत:च्या वाहनावर दंड आहे की नाही, हे पाहण्याची वेळ ओढावत आहे.

--

वाहनावर दंड आहे का, या ॲपवर शोधा

मोबाइलमध्ये महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून आपल्या वाहनावर एखादा दंड आहे का, हे पाहणे अगदी सोपे आहे. या ॲपमध्ये वाहनासंबंधी आवश्यक ती माहिती भरल्यानंतर ई-चालानची माहिती मिळू शकते. वाहनाला दंड लागलेला असेल, तर तो भरण्याची सुविधाही ॲपमध्ये देण्यात आलेली आहे.

------

प्रलंबित दंड भरावा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाचे ई-चालान निर्माण होते. हे ई-चालान कोणत्याही वाहतूक सिग्नलवर कार्यरत वाहतूक पोलीस अंमलदाराकडे तसेच महा ट्रॅफिक ॲपद्वारे आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात भरता येते. वाहनावर दंडाची रक्कम प्रलंबित असल्याचे कळताच वाहनधारकांनी तातडीने स्वत:हून ई-चालानचा भरणा करावा.

- मुकुंद देशमुख, वाहतूक निरीक्षक