शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रक्रिया उद्योगातून तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शेतीवर आधारित पूरक उद्योग, अन्न व फळ पॅकेजिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील ...

औरंगाबाद : शेतीवर आधारित पूरक उद्योग, अन्न व फळ पॅकेजिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याची गरज कृषी उद्योजक, तज्ज्ञांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विलासराव देशमुख अध्यासन केंद्रातर्फे कृषी उद्योजकता विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. या परिसंवादाचे उद्घाटन नॅचरल शुगर्सचे संस्थापक बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठोंबरे म्हणाले, कृषिप्रधान व्यवस्थेच्या विकासातूनच राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे, याची जाणीव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना होती. म्हणून त्यांनी राज्याच्या विकासाच्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले. कृषी आणि सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी शेती, सहकार व शिक्षणाच्या क्षेत्रात लातूर पॅटर्न विकसित केले.

कृषितज्ञ उदय देवळाणकर म्हणाले, कोरोनानंतर जगात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नव्याने विचार सुरू झाला आहे. त्यामुळे तेलबिया आणि डाळ उत्पादन करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे तेल बिया आणि डाळी उत्पादनाची ताकद आहे.

नेटिव्ह कोंबक बांबूचे संस्थापक संजीव कर्पे म्हणाले, राज्यातील आठ टक्के पडीक जमीन व १० टक्के कमी उत्पादन देणारी शेतजमीन बांबू लागवडीखाली आणल्यास ३० लक्ष हेक्टरवर बांबू लागवड होईल. विदर्भात जवळपास १२.५ लक्ष हेक्टरवर वनशेती व बांबू लागवड केली जाऊ शकते. भीमा बांबू, तुरडा, नूटन, पालीमार्फा, कटांग या उच्च उत्पादन देणाऱ्या बांबूच्या प्रजाती आहेत. यांची लागवड केल्यास हेक्टरी ५० ते ५५ टन उत्पादन मिळविणे शक्य असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. भगवान साखळे यांची उपस्थिती होती. अध्यासन केद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. किरण रेड्डी याने सूत्रसंचालन, तर डॉ. गणेश बडे यांनी आभार मानले.