शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कृषी प्रक्रिया उद्योगातून तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शेतीवर आधारित पूरक उद्योग, अन्न व फळ पॅकेजिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील ...

औरंगाबाद : शेतीवर आधारित पूरक उद्योग, अन्न व फळ पॅकेजिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याची गरज कृषी उद्योजक, तज्ज्ञांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विलासराव देशमुख अध्यासन केंद्रातर्फे कृषी उद्योजकता विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. या परिसंवादाचे उद्घाटन नॅचरल शुगर्सचे संस्थापक बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठोंबरे म्हणाले, कृषिप्रधान व्यवस्थेच्या विकासातूनच राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे, याची जाणीव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना होती. म्हणून त्यांनी राज्याच्या विकासाच्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले. कृषी आणि सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी शेती, सहकार व शिक्षणाच्या क्षेत्रात लातूर पॅटर्न विकसित केले.

कृषितज्ञ उदय देवळाणकर म्हणाले, कोरोनानंतर जगात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नव्याने विचार सुरू झाला आहे. त्यामुळे तेलबिया आणि डाळ उत्पादन करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे तेल बिया आणि डाळी उत्पादनाची ताकद आहे.

नेटिव्ह कोंबक बांबूचे संस्थापक संजीव कर्पे म्हणाले, राज्यातील आठ टक्के पडीक जमीन व १० टक्के कमी उत्पादन देणारी शेतजमीन बांबू लागवडीखाली आणल्यास ३० लक्ष हेक्टरवर बांबू लागवड होईल. विदर्भात जवळपास १२.५ लक्ष हेक्टरवर वनशेती व बांबू लागवड केली जाऊ शकते. भीमा बांबू, तुरडा, नूटन, पालीमार्फा, कटांग या उच्च उत्पादन देणाऱ्या बांबूच्या प्रजाती आहेत. यांची लागवड केल्यास हेक्टरी ५० ते ५५ टन उत्पादन मिळविणे शक्य असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. भगवान साखळे यांची उपस्थिती होती. अध्यासन केद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. किरण रेड्डी याने सूत्रसंचालन, तर डॉ. गणेश बडे यांनी आभार मानले.