शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

दुग्ध व्यवसायातून युवा शेतकऱ्याने अल्पावधीतच साधली आर्थिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:08 IST

यशकथा : या तरुण शेतकऱ्याने शेतीतून उत्पन्न मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा सुरू केला.

-  गजानन बडक  ( औरंगाबाद) 

नोकरीच्या वाटा अवघड वाटल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, ता. सिल्लोड येथील गणेश बारकू जोनवाळ या तरुणाने शेतीचा मार्ग धरला. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर दुष्काळ असल्याने शेतीतून उत्पन्न मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा सुरू केला. यात अल्पावधीतच गणेश याने यशस्वीरीत्या प्रगती करून आर्थिक उन्नती साधली आहे.

पळशी हे छोटे गाव असून, या गावातील बहुतांश नागरिक हे शेती करतात. गणेश जोनवाळ या तरुणाचे शिक्षण बारावीपर्यंत झाल्यानंतर त्याला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. इतर तरुणांप्रमाणे औरंगाबादेत एखाद्या कंपनीत काम करण्याचा त्याचा मानस होता. अर्थात कुटुंबियांनाही गणेशने नोकरी करावी, अशीच इच्छा होती. कारण दुष्काळामुळे शेतीतून काहीही हाती लागत नसल्याचा अनुभव त्यांना होता. मात्र, गणेश नुसते शेती क्षेत्र निवडून थांबला नसून, त्याने यासोबतच शेतीपूरक जोडधंदा करण्याचे ठरविले. मित्रांसोबत चर्चा करून तसेच इतर ठिकाणाहून माहिती मिळवून गणेश दुग्ध व्यवसायाकडे वळला.

गणेशकडे शेतीक्षेत्र कमी होते, तसेच त्याच्याकडे आर्थिक गणित जुळत नसल्याने सुरुवातीला एक गाय घेऊन त्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय परवडत असल्याने हळूहळू त्याची आर्थिक उन्नती होत गेली. यातून त्याने हळूहळू गायींची संख्या वाढविणे सुरू केले. आज गणेशकडे १३ गायी व दोन म्हशी आहेत. दररोज ९० ते १०० लिटर दूध हा तरुण दूध संकलन केंद्रात देतो. संकलन केंद्रात दुधाला २३ ते २६ रुपये दर मिळत असल्याने महिन्याकाठी सर्व खर्च वजा जाता गणेशला ४५ ते ५० हजार नुसता नफा राहत असल्याचे गणेशने सांगितले.

गत तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चारा व पाणीटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत नियोजन आवश्यक आहे. गणेशने चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी बाहेरील  जिल्ह्यामधून चारा आणून व्यवसायात खंड पडू दिला नाही. पाण्याचे नियोजनही त्याने काटेकोरपणे केलेले आहे. दररोज इतके दूध काढण्यासाठी मोठी शारीरिक कसरत करावी लागत असे. दररोज एक तास नुसते दूध काढायला खर्ची घालावा लागत होता. हे श्रम थांबविण्यासाठी गणेशने ६५ हजार रुपये खर्च करून दूध काढण्याचे आधुनिक यंत्र विकत आणले आहे. या यंत्रात वीज नसली तर जनरेटरची देखील सोय केली आहे. या मिल्क यंत्रामुळे अवघ्या १५ मिनिटांत दूध काढले जात असल्याने वेळ व शारीरिक त्रास कमी झाला आहे.

निसर्गाच्या वेळोवेळी होत असलेल्या अवकृपेमुळे सुशिक्षित तरुणांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे गणेश सांगतो. यासाठी शासनाकडूनही विविध योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी अनुदानही मिळत असल्याने तरुणांना जोडधंदा अवघड नसल्याचे तो सांगतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी