शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

विवाह प्रमाणपत्रासाठी जावे लागते दवाखान्यात

By | Updated: December 4, 2020 04:00 IST

औरंगाबाद: तुम्हाला जर विवाह प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला थेट महानगरपालिकेच्या दवाखान्यात जावे लागेल. हे वाचून तुम्हाला धक्का बसला ...

औरंगाबाद: तुम्हाला जर विवाह प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला थेट महानगरपालिकेच्या दवाखान्यात जावे लागेल. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे सत्य आहे. रुग्णतपासणी सोडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना पती-पत्नीची सत्यता पडताळणी करावी लागत आहे.

शासकीय कामकाज कसे चालते त्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला महानगरपालिकेच्या कामकाजात पाहिला मिळते. डॉक्टरचे काम रुग्णाला तपासणे व उपचार करणे हे असते. मात्र, मागील काही वर्षांपासून मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पती- पत्नीचे खरंच लग्न झाले होते काय, हे तपासण्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे कोणाला लग्नानंतर काही वर्षांने विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता पडल्यास, झोन कार्यालयात अर्ज करावा लागतो. ती फाईल त्या झोनमधील मनपाच्या दवाखान्यात जाते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याला सत्यता पडताळणीचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व कागदपत्रे, त्या दांपत्याची लग्नपत्रिका, लग्नातील सोबतचे फोटो, ज्याने लग्न लावले त्या पुरोहिताची स्वाक्षरी व दोन साक्षीदार यांची सत्यता पडताळणी करून मगच लग्न झाले आहे की नाही, हे वैद्यकीय अधिकारी निष्कर्ष काढतात व मगच फाईल मंजूर करतात.

पूर्वी सत्यता पडताळणीचे अधिकार संबंधित वाॅर्ड अधिकाऱ्यांनाच होते. यामुळे एकाच इमारतीत विवाह प्रमाणपत्राचे काम होत असे. आता ऑनलाईन अर्ज करता येत असला तरी सत्यता पडताळणीसाठी दवाखान्यातच जावे लागते. तसे पाहिले तर सत्यता पडताळणीचा व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा काहीच संबंध नाही.

चौकट

कर भरला तरच मिळते प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्र असे सहजासहजी मिळत नाही. तुम्ही जर मनपाचा कर म्हणजे मालमत्ता कर, पाणीपट्टी व एनए अकृषीकर ३१ मार्च २०२१ पर्यंत भरला असेल तरच विवाह प्रमाणपत्र मिळते.

चौकट

मनपाकडे नाहीये एकत्रित माहिती

शहरात किती दांपत्यानी विवाह प्रमाणपत्र घेतले याची एकत्रित आकडेवारी मनपाकडे नाही. ९ झोन कार्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांकडे त्याच्या झोनपुरतीच माहिती मिळते. तो जर नवीन बदली होऊन आलेला असेल तर त्याला मागील १० वर्षांतील आकडेवारी शोधण्यास वेळ लागतो.