शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

विवाह प्रमाणपत्रासाठी जावे लागते दवाखान्यात

By | Updated: December 4, 2020 04:00 IST

औरंगाबाद: तुम्हाला जर विवाह प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला थेट महानगरपालिकेच्या दवाखान्यात जावे लागेल. हे वाचून तुम्हाला धक्का बसला ...

औरंगाबाद: तुम्हाला जर विवाह प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला थेट महानगरपालिकेच्या दवाखान्यात जावे लागेल. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे सत्य आहे. रुग्णतपासणी सोडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना पती-पत्नीची सत्यता पडताळणी करावी लागत आहे.

शासकीय कामकाज कसे चालते त्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला महानगरपालिकेच्या कामकाजात पाहिला मिळते. डॉक्टरचे काम रुग्णाला तपासणे व उपचार करणे हे असते. मात्र, मागील काही वर्षांपासून मनपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पती- पत्नीचे खरंच लग्न झाले होते काय, हे तपासण्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे कोणाला लग्नानंतर काही वर्षांने विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता पडल्यास, झोन कार्यालयात अर्ज करावा लागतो. ती फाईल त्या झोनमधील मनपाच्या दवाखान्यात जाते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याला सत्यता पडताळणीचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व कागदपत्रे, त्या दांपत्याची लग्नपत्रिका, लग्नातील सोबतचे फोटो, ज्याने लग्न लावले त्या पुरोहिताची स्वाक्षरी व दोन साक्षीदार यांची सत्यता पडताळणी करून मगच लग्न झाले आहे की नाही, हे वैद्यकीय अधिकारी निष्कर्ष काढतात व मगच फाईल मंजूर करतात.

पूर्वी सत्यता पडताळणीचे अधिकार संबंधित वाॅर्ड अधिकाऱ्यांनाच होते. यामुळे एकाच इमारतीत विवाह प्रमाणपत्राचे काम होत असे. आता ऑनलाईन अर्ज करता येत असला तरी सत्यता पडताळणीसाठी दवाखान्यातच जावे लागते. तसे पाहिले तर सत्यता पडताळणीचा व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा काहीच संबंध नाही.

चौकट

कर भरला तरच मिळते प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्र असे सहजासहजी मिळत नाही. तुम्ही जर मनपाचा कर म्हणजे मालमत्ता कर, पाणीपट्टी व एनए अकृषीकर ३१ मार्च २०२१ पर्यंत भरला असेल तरच विवाह प्रमाणपत्र मिळते.

चौकट

मनपाकडे नाहीये एकत्रित माहिती

शहरात किती दांपत्यानी विवाह प्रमाणपत्र घेतले याची एकत्रित आकडेवारी मनपाकडे नाही. ९ झोन कार्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांकडे त्याच्या झोनपुरतीच माहिती मिळते. तो जर नवीन बदली होऊन आलेला असेल तर त्याला मागील १० वर्षांतील आकडेवारी शोधण्यास वेळ लागतो.