शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तुम्ही व्यथा निवारण करा, गाथा आपोआप बनेल

By admin | Updated: April 25, 2016 00:46 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत अनेक जण भावनेच्या भरात शेतकऱ्यांना मदत करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांना मदतीपेक्षाही तुमच्या धीराची जास्त गरज आहे.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत अनेक जण भावनेच्या भरात शेतकऱ्यांना मदत करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांना मदतीपेक्षाही तुमच्या धीराची जास्त गरज आहे. कारण शेतकरी कधीही लाचार होऊ इच्छित नाही. तो देता आहे, असे मत कृषितज्ज्ञ विजय बोराडे यांनी मराठवाडा दुष्काळ संवेदना मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. तुम्ही व्यथा निवारण करा, गाथा आपोआप बनेल, असा सल्लाही त्यांनी संयोजकांना दिला. जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतीने देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात दुष्काळ संवेदना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, कृषितज्ज्ञ विजय बोराडे, उद्योजक समीर दुधगावकर, फाऊंडेशनचे नितीन चिलवंत, अ‍ॅड. विठ्ठल भिसे यांची उपस्थिती होती. फाऊंडेशनच्या वतीने परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एक लाख बियाणे थैल्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी फाऊंडेशनने आतापर्यंत पुणे, परभणी आदी ठिकाणी मेळावे घेतले आहेत. विजय बोराडे यांनी फाऊंडेशनच्या या कामाचे कौतुक केले. परंतु सोबतच शेतकऱ्यांना तुमच्या मदतीपेक्षा धीराची गरज अधिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्या राज्यात भावनेच्या भरात अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र, कोणतीही मदत संबंधित व्यक्तीला लाचार बनविण्याचा धोका असतो. शेतकरी कधीही लाचार बनू इच्छित नाही. तो आज अडचणीत आहे. त्याला तुमच्या मदतीची गरज आहे; परंतु मोठा भाऊ म्हणून त्याला मदत करा, धीर द्या, असेही बोराडे म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनीही अडचणीतील शेतकऱ्यांसाठी फाऊंडेशन करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तर उद्योजक समीर दुधगावकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नितीन चिलवंत यांच्यासह इतरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. विठ्ठल भिसे यांनी केले. नुसत्या नद्या खोदू नकाकृषितज्ज्ञ विजय बोराडे यांनी नदी खोलीकरणाच्या उपक्रमावर यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या व्यथा अनेक अंगांनी समजून त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. शासनही नुसत्या नद्या उकरत आहे. तुम्ही नदी खोल केली तर माथ्यावरील विहिरींमधील पाणी नदीत येईल. विहिरी कोरड्या होतील. नाल्यात बारमाही पाणी दिसले, पण त्यामुळे नदीभोवतालच्यांचेच भले होईल. शिवाय जमीन पाणी मुरण्यासाठी पोषक थर आपण नाहीसा करतो आहोत. म्हणून खोलीकरणाऐवजी महात्मा फुल्यांनी सांगितलेल्या एकात्मिक पाणलोट विकासाचा मार्ग अवलंबिला पाहिजे, अशी अपेक्षा बोराडे यांनी व्यक्त केली.