शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी खाताय, टायफॉइड घरी घेऊन तर जात नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:02 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन घरी घेऊन जात तर नाहीत ना? पाणीपुरीचे पाणी दूषित असेल तर तुम्हाला टायफॉइड होण्याचा धोका आहे. पाणीपुरी विक्रेता, हॉटेलमध्ये अन्न पदार्थ तयार करणारा अथवा वाढणाऱ्या व्यक्ती टायफॉइड जंतूचा वाहक असेल तर तुम्हालाही टायफॉइड अर्थात विषमज्वराची लागण होऊ शकते.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरासोबतच टायफॉइडची साथही वाढीस लागते. टायफॉइड जंतूचे वाहक असलेल्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यपदार्थ सेवन केले अथवा दूषित पाणी सेवन केल्यामुळे टायफॉइड होतो. या आजारात सुरुवातीला ताप येण्यास सुरुवात होते. यानंतर हगवण लागते. टायफॉइडच्या रुग्णाचा ताप वाढत असतो. यामुळे रुग्ण अत्यंत कमकुवत होतो. तापेच्या रुग्णाला टायफॉइडची लागण झाली अथवा नाही, हे पाहण्यासाठी विडाल चाचणी करावी लागते. सुरुवातीला आठ दिवस ताप असलेल्या रुग्णालयाच्या रक्तनमुन्याची चाचणी टायफॉइड पॉझिटिव्ह येत नाही. असे असले तरी डॉक्टर रुग्णाला टायफॉइडची लक्षणे दिसत असल्यास टायफॉइडचेच औषधोपचार सुरू करतात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. तापेवरील औषधी टायफॉइडच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ९५ टक्के रुग्ण खाजगी रुग्णालयात टायफॉइडवर उपचार घेऊन बरे होतात. आठ ते दहा दिवस उपचार केल्यानंतरही ताप उतरत नसेल तर रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या(घाटी) मेडिसिन विभागात दाखल होतात. पावसाळ्यात घाटीतील टायफॉइड रुग्णसंख्या वाढत असल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी नमूद केले.

-------------------------------------------

काय आहेत आजाराची लक्षणे

१) ताप येणे

२) आठ ते दहा दिवस ताप चढत राहणे.

३) पोट दुखणे

४) संडास लागणे

-------------------------------------------------------

काय घ्यावी काळजी

१) दूषित पाणी पिण्याचे टाळावे.

२) पाणीपुरीचे पाणी दूषित असू शकते; शिवाय पाणीपुरी विक्रेत्याचा स्पर्श पाण्याला आणि पाणीपुरीला होतो, अशा ठिकाणी पाणीपुरी खाऊ नये.

३) स्वच्छता असलेल्या हॉटेल्स, ढाबे अशा ठिकाणी जेवण करा.

४) तापेमुळे फणफणत असलेल्या व्यक्तीने बनविलेले पदार्थ खाऊ नयेत.

------------------------------

घाटी रुग्णालयातील रुग्ण संख्या

जून- १५

जुलै- १७

ऑगस्ट- ७

----------------------------------------

कोट

वर्षभर टायफॉइडचे रुग्ण घाटीत दाखल होतात. काही लोक टायफॉइडचे वाहक असतात. ताप येतो, पोट दुखणे, हगवण लागणे आदी लक्षणे रुग्णांत दिसतात. शिवाय या रुग्णांचा ताप सतत चढत असतो. दूषित पाणी पिल्याने आणि टायफॉइडचे जंतू वाहक असलेल्या व्यक्तीने दिलेले अथवा तयार केलेले पदार्थ खाल्ल्यास टायफॉइडची लागण होण्याचा धोका असतो. विशेषत: पाणीपुरीतून टायफॉइडचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. बाहेर खाल्ल्याशिवाय पर्याय नसेल तर कमीतकमी गरम पदार्थ खावेत.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभाग प्रमुख, घाटी रुग्णालय.