शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाणीपुरी खाताय, टायफॉइड घरी घेऊन तर जात नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:02 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन घरी घेऊन जात तर नाहीत ना? पाणीपुरीचे पाणी दूषित असेल तर तुम्हाला टायफॉइड होण्याचा धोका आहे. पाणीपुरी विक्रेता, हॉटेलमध्ये अन्न पदार्थ तयार करणारा अथवा वाढणाऱ्या व्यक्ती टायफॉइड जंतूचा वाहक असेल तर तुम्हालाही टायफॉइड अर्थात विषमज्वराची लागण होऊ शकते.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरासोबतच टायफॉइडची साथही वाढीस लागते. टायफॉइड जंतूचे वाहक असलेल्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यपदार्थ सेवन केले अथवा दूषित पाणी सेवन केल्यामुळे टायफॉइड होतो. या आजारात सुरुवातीला ताप येण्यास सुरुवात होते. यानंतर हगवण लागते. टायफॉइडच्या रुग्णाचा ताप वाढत असतो. यामुळे रुग्ण अत्यंत कमकुवत होतो. तापेच्या रुग्णाला टायफॉइडची लागण झाली अथवा नाही, हे पाहण्यासाठी विडाल चाचणी करावी लागते. सुरुवातीला आठ दिवस ताप असलेल्या रुग्णालयाच्या रक्तनमुन्याची चाचणी टायफॉइड पॉझिटिव्ह येत नाही. असे असले तरी डॉक्टर रुग्णाला टायफॉइडची लक्षणे दिसत असल्यास टायफॉइडचेच औषधोपचार सुरू करतात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. तापेवरील औषधी टायफॉइडच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ९५ टक्के रुग्ण खाजगी रुग्णालयात टायफॉइडवर उपचार घेऊन बरे होतात. आठ ते दहा दिवस उपचार केल्यानंतरही ताप उतरत नसेल तर रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या(घाटी) मेडिसिन विभागात दाखल होतात. पावसाळ्यात घाटीतील टायफॉइड रुग्णसंख्या वाढत असल्याचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी नमूद केले.

-------------------------------------------

काय आहेत आजाराची लक्षणे

१) ताप येणे

२) आठ ते दहा दिवस ताप चढत राहणे.

३) पोट दुखणे

४) संडास लागणे

-------------------------------------------------------

काय घ्यावी काळजी

१) दूषित पाणी पिण्याचे टाळावे.

२) पाणीपुरीचे पाणी दूषित असू शकते; शिवाय पाणीपुरी विक्रेत्याचा स्पर्श पाण्याला आणि पाणीपुरीला होतो, अशा ठिकाणी पाणीपुरी खाऊ नये.

३) स्वच्छता असलेल्या हॉटेल्स, ढाबे अशा ठिकाणी जेवण करा.

४) तापेमुळे फणफणत असलेल्या व्यक्तीने बनविलेले पदार्थ खाऊ नयेत.

------------------------------

घाटी रुग्णालयातील रुग्ण संख्या

जून- १५

जुलै- १७

ऑगस्ट- ७

----------------------------------------

कोट

वर्षभर टायफॉइडचे रुग्ण घाटीत दाखल होतात. काही लोक टायफॉइडचे वाहक असतात. ताप येतो, पोट दुखणे, हगवण लागणे आदी लक्षणे रुग्णांत दिसतात. शिवाय या रुग्णांचा ताप सतत चढत असतो. दूषित पाणी पिल्याने आणि टायफॉइडचे जंतू वाहक असलेल्या व्यक्तीने दिलेले अथवा तयार केलेले पदार्थ खाल्ल्यास टायफॉइडची लागण होण्याचा धोका असतो. विशेषत: पाणीपुरीतून टायफॉइडचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. बाहेर खाल्ल्याशिवाय पर्याय नसेल तर कमीतकमी गरम पदार्थ खावेत.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभाग प्रमुख, घाटी रुग्णालय.