शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

होय! मी रा. स्व. संघाचा, आधी अंबुज, नंतर मंत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST

‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.

ठळक मुद्देदिलीप कांबळे : एससीच्या आरक्षणाचीही होऊ शकते अ, ब, क, ड वर्गवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.ते संत एकनाथ रंगमंदिरात मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचाराकडे बोट दाखवीत घणाघाती टीका केली व सल्ला दिला की, आता मातंग समाजाच्या तरुणांनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. त्यासाठी सरकार योजना आखत असल्याचे नमूद केले.यावेळी आ. अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक रमेश पांडव यांची भाषणे झाली. प्रा. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपमहापौर विजय औताडे, नगरसेविका ज्योती नाडे, डॉ. शेषराव नाडे, जालिंदर शेंडगे, नगरसेविका कीर्ती शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती. राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी ठरावांचे वाचन केले. बागडे यांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. संजय सांभाळकर, किशनचंद तनवाणी, महेंद्र सोनवणे, मनीषा भन्साळी, अविनाश साळवे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, जगदीश वाघमारे, तुकाराम सोळसे यांना प्रदान केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बबनराव दाभाडे, राजीव खाजेकर, मच्छिंद्र कांबळे, राजूअण्णा खाजेकर, शांताबाई दणके, छाया खाजेकर, राजश्री साठे, सुनीता भालेराव, सुरेखा दणके, काकासाहेब नाडे आदींनी परिश्रम घेतले.