शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

होय! मी रा. स्व. संघाचा, आधी अंबुज, नंतर मंत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST

‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.

ठळक मुद्देदिलीप कांबळे : एससीच्या आरक्षणाचीही होऊ शकते अ, ब, क, ड वर्गवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.ते संत एकनाथ रंगमंदिरात मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचाराकडे बोट दाखवीत घणाघाती टीका केली व सल्ला दिला की, आता मातंग समाजाच्या तरुणांनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. त्यासाठी सरकार योजना आखत असल्याचे नमूद केले.यावेळी आ. अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक रमेश पांडव यांची भाषणे झाली. प्रा. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपमहापौर विजय औताडे, नगरसेविका ज्योती नाडे, डॉ. शेषराव नाडे, जालिंदर शेंडगे, नगरसेविका कीर्ती शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती. राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी ठरावांचे वाचन केले. बागडे यांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. संजय सांभाळकर, किशनचंद तनवाणी, महेंद्र सोनवणे, मनीषा भन्साळी, अविनाश साळवे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, जगदीश वाघमारे, तुकाराम सोळसे यांना प्रदान केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बबनराव दाभाडे, राजीव खाजेकर, मच्छिंद्र कांबळे, राजूअण्णा खाजेकर, शांताबाई दणके, छाया खाजेकर, राजश्री साठे, सुनीता भालेराव, सुरेखा दणके, काकासाहेब नाडे आदींनी परिश्रम घेतले.