शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

होय! मी रा. स्व. संघाचा, आधी अंबुज, नंतर मंत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST

‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.

ठळक मुद्देदिलीप कांबळे : एससीच्या आरक्षणाचीही होऊ शकते अ, ब, क, ड वर्गवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.ते संत एकनाथ रंगमंदिरात मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचाराकडे बोट दाखवीत घणाघाती टीका केली व सल्ला दिला की, आता मातंग समाजाच्या तरुणांनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. त्यासाठी सरकार योजना आखत असल्याचे नमूद केले.यावेळी आ. अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक रमेश पांडव यांची भाषणे झाली. प्रा. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपमहापौर विजय औताडे, नगरसेविका ज्योती नाडे, डॉ. शेषराव नाडे, जालिंदर शेंडगे, नगरसेविका कीर्ती शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती. राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी ठरावांचे वाचन केले. बागडे यांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. संजय सांभाळकर, किशनचंद तनवाणी, महेंद्र सोनवणे, मनीषा भन्साळी, अविनाश साळवे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, जगदीश वाघमारे, तुकाराम सोळसे यांना प्रदान केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बबनराव दाभाडे, राजीव खाजेकर, मच्छिंद्र कांबळे, राजूअण्णा खाजेकर, शांताबाई दणके, छाया खाजेकर, राजश्री साठे, सुनीता भालेराव, सुरेखा दणके, काकासाहेब नाडे आदींनी परिश्रम घेतले.