शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

पिवळ्या पाण्याची शिक्षा !

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाल्याने धरणातील पाणी थेट नळाद्वारे जसेच्या तसे येत आहे. याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीय मात्र महिनाभरापासून पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहे.कळंब शहर व डिकसळ या गावातील जवळपास ४० हजार नागरिकांना कळंब पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो आहे. सध्या शहरातील विविध भागात न.प. तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करते. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना नळाद्वारे पिवळे पाणी मिळत आहे. शहरातील सर्वच भागात हीच परिस्थिती आढळून येत असल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. न.प. प्रशासन दरवर्षी पाण्याच्या शुद्धीकरणावर लाखो रुपये खर्च करते. तुरटी, पावडर आदी वस्तूंची नियमितपणे व प्राधान्याने खरेदी केली जाते. मागील सत्ताधारी मंडळींनी जाता-जाता लाखो रुपये खर्चून या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळही काढला होता. प्रशासनाकडे पाणी शुद्धीकरण करण्याच्या वस्तूंची कमतरता नसतानाही शहरवासीयांच्या नशिबी पिवळे पाणी कशामुळे? असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.न.प.ने नुकतीच ‘मार्च एण्ड’च्या नावाखाली जवळपास ८० टक्के पाणीपट्टी वसूल केली आहे. ज्यांनी पाणीपट्टी वा इतर कर भरला नाही अशा ‘टॉप टेन’ थकबाकीदारांचे डिजिटल बॅनर शहरात झळकावून त्यांचा उद्धार केला; मग पाणीपट्टी भरूनही अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या न.प. प्रशासनाचा कसा निषेध व्यक्त करावा, अशी प्रतिक्रियाही शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत न.प. प्रशासन मात्र स्पष्टपणे काहीही सांगत नाही. धरणातून पाणी ढवळून येत असल्याने ते पूर्ण क्षमतेने शुद्ध होत नसल्याचे न.प.चे म्हणणे आहे; मात्र हा प्रकार महिनाभरापासून सुरू असताना यावर न.प. प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. मग गढूळ पाणी येण्याचा संबंध काय? पाणी ढवळून येत असेल व ते शुद्धच होत नसेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणाची वाट बघितली जात आहे, हा प्रश्नही आता सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागल्याने आगामी काळात पिवळे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे(वार्ताहर)