शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पिवळ्या पाण्याची शिक्षा !

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाल्याने धरणातील पाणी थेट नळाद्वारे जसेच्या तसे येत आहे. याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीय मात्र महिनाभरापासून पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहे.कळंब शहर व डिकसळ या गावातील जवळपास ४० हजार नागरिकांना कळंब पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो आहे. सध्या शहरातील विविध भागात न.प. तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करते. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना नळाद्वारे पिवळे पाणी मिळत आहे. शहरातील सर्वच भागात हीच परिस्थिती आढळून येत असल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. न.प. प्रशासन दरवर्षी पाण्याच्या शुद्धीकरणावर लाखो रुपये खर्च करते. तुरटी, पावडर आदी वस्तूंची नियमितपणे व प्राधान्याने खरेदी केली जाते. मागील सत्ताधारी मंडळींनी जाता-जाता लाखो रुपये खर्चून या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळही काढला होता. प्रशासनाकडे पाणी शुद्धीकरण करण्याच्या वस्तूंची कमतरता नसतानाही शहरवासीयांच्या नशिबी पिवळे पाणी कशामुळे? असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.न.प.ने नुकतीच ‘मार्च एण्ड’च्या नावाखाली जवळपास ८० टक्के पाणीपट्टी वसूल केली आहे. ज्यांनी पाणीपट्टी वा इतर कर भरला नाही अशा ‘टॉप टेन’ थकबाकीदारांचे डिजिटल बॅनर शहरात झळकावून त्यांचा उद्धार केला; मग पाणीपट्टी भरूनही अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या न.प. प्रशासनाचा कसा निषेध व्यक्त करावा, अशी प्रतिक्रियाही शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत न.प. प्रशासन मात्र स्पष्टपणे काहीही सांगत नाही. धरणातून पाणी ढवळून येत असल्याने ते पूर्ण क्षमतेने शुद्ध होत नसल्याचे न.प.चे म्हणणे आहे; मात्र हा प्रकार महिनाभरापासून सुरू असताना यावर न.प. प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. मग गढूळ पाणी येण्याचा संबंध काय? पाणी ढवळून येत असेल व ते शुद्धच होत नसेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणाची वाट बघितली जात आहे, हा प्रश्नही आता सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागल्याने आगामी काळात पिवळे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे(वार्ताहर)